[अंतरराष्ट्रीय]
१- 31 डिसेंबरनंतर काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद!
२- पाककडून 300 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग
३- BSF जवानांपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, सफेद झेंडे दाखवत घेतली माघार
४- चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम
५- माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे पर्यावरण हानी नाही : सरकार
७- यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे
८- समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदा भाजपला
९- पुण्यातील कर्ण, केळकर दाम्पत्यांची आयुष्यभराची पुंजी देशाला दान
१०- जीएसटीचे दर जाहीर, चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के टॅक्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- विलास शिंदे हत्या : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार
१२- कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक
१३- मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार
१४- दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा!
१५- वडापाव महागला, डाळी कडाडल्याने खिशाला चाट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- वाराणसी एक्स्प्रेस 22 तास उशिराने, पुणे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा
१७- सोलापूर; कुऱ्हाडीचे वार करुन सुनेची हत्या, आरोपी सासरा पसार
१८- बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या
१९- मुंबई; लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू
२०- गुजरात; विषारी वायुगळतीमुळे 13 कामगारांचा मृत्यू
२१- ओटावा; कुत्रिम गर्भधारणेत डॉक्टरने स्वत:चे स्पमर्स वापरुन केली महिलेची फसवणूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- ईशांत शर्माची 'विकेट', पुढच्या महिन्यात विवाहबंधनात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

१- 31 डिसेंबरनंतर काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद!
२- पाककडून 300 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग
३- BSF जवानांपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, सफेद झेंडे दाखवत घेतली माघार
४- चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम
५- माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे पर्यावरण हानी नाही : सरकार
७- यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे
८- समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदा भाजपला
९- पुण्यातील कर्ण, केळकर दाम्पत्यांची आयुष्यभराची पुंजी देशाला दान
१०- जीएसटीचे दर जाहीर, चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के टॅक्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- विलास शिंदे हत्या : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार
१२- कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक
१३- मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार
१४- दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा!
१५- वडापाव महागला, डाळी कडाडल्याने खिशाला चाट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- वाराणसी एक्स्प्रेस 22 तास उशिराने, पुणे स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा
१७- सोलापूर; कुऱ्हाडीचे वार करुन सुनेची हत्या, आरोपी सासरा पसार
१८- बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या
१९- मुंबई; लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू
२०- गुजरात; विषारी वायुगळतीमुळे 13 कामगारांचा मृत्यू
२१- ओटावा; कुत्रिम गर्भधारणेत डॉक्टरने स्वत:चे स्पमर्स वापरुन केली महिलेची फसवणूक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- ईशांत शर्माची 'विकेट', पुढच्या महिन्यात विवाहबंधनात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स*
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================
विलास शिंदे हत्या : अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालणार
मुंबई : वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालवण्यात येणार आहे. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.
अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सरकारने अल्पवयीन आरोपींसंदर्भातील कायद्यात बदल केला आहे.
=====================================
कन्नडीगांचा दबाव, एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना अटक
बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली. कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली जात आहे.
यापू्र्वी पोलिसांनी एकीकरण समितीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर दोन पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत.
काळ्या दिनाच्या फेरीत ठाकूरच्या वेशात हातात एअर गन धरून, घोड्यावर स्वार झालेल्या रत्नप्रसाद पवार या तरुणाला पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे असे गुन्हे मार्केट पोलिसात नोंदवण्यात आले आहेत. अन्य पाच कार्यकर्त्यावर लाल पिवळे ध्वज, पताके काढून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न, असे गुन्हे शहापूर पोलिसांनी नोंदवले आहेत.
या पाच जणांना आणि रत्नप्रसाद पवार यांना न्यायालयात हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने वकील सुधीर चव्हाण, महेश बिर्जे,अमर येळ्ळूरकर,शाम पाटील यांच्यासह अन्य वकिलांनी न्यायालयात बाजू मांडून जामीन अर्ज दाखल केला.
शहापूर पोलीस स्थानकात अटक केलेल्या पाच कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, पण कारागृहातून सुटका करण्याची वेळ टळून गेल्यामुळे त्यांची सुटका उद्या होणार आहे . तर रत्नप्रसाद पवार यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
=====================================
अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे पर्यावरण हानी नाही : सरकार
मुंबई : अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने केंद्रीय हरित लवादाला पाठवलं आहे. सरकारच्या या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छिमार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिवस्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असा दावा करत पर्यावरणवाद्यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारनं पाठवलेल्या पत्रात या प्रकल्पामुळे कोणतीही हानी होणार नसल्याचा दावा केला आहे.
भर समुद्रात बांधकाम करुन जर पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असं सरकारला वाटत असेल, तर सरकारच्या दृष्टीने ‘पर्यावरण म्हणजे नेमकं काय?’ असा सवालही पर्यावरणतज्ज्ञ आनंद पेंढारकर यांनी उपस्थित केला आहे.
शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईतील कफ परेडजवळच्या समुद्रात बांधण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. मात्र पर्यावरणाला धोका असल्याने स्मारक समुद्रात उभारण्यात येऊ नये, असं सांगत पर्यावरणतज्ज्ञ प्रदीप पाताडे आणि अखिल मच्छीमार कृती मंडळाचे संचालक दामोदर तांडेल यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली.
=====================================
मनसेचं इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावणार
मुंबई : एकहाती सत्तेचं स्वप्न भंगल्याने भरकटलेल्या मनसेच्या इंजिनची दिशा पुन्हा बदलण्यात येणार आहे. डावीकडून उजवीकडे धावणारं इंजिन आता पुन्हा उजवीकडून डाव्या दिशेने धावणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार तोंडावर आपटल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
2012 पर्यंत जोरदार वेगाने धावणाऱ्या इंजिनची दिशा डावीकडे होती. मात्र, 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळालं. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या पक्षाचं चिन्हं मराठी भाषा ज्या प्रमाणे लिहितात त्याप्रमाणेच म्हणजे उजवीकडे धावणारं हवं यावर एकमत झालं आणि इंजिनची दिशा बदलली. मात्र, सध्या मनसेचं इंजिन थेट यार्डात पोहचल्यानं आगामी पालिका निवडणुकांसाठी नवा बदल करण्याचा सल्ला वास्तूतज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे 8 नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या मेळाव्याच्या जाहिरातीवर डावीकडे धावणारं इंजिन छापण्यात आले आहे. तसेच लेटरहेडवरही ‘श्री जयमहाराष्ट्र’ आणि राजमुद्राही छापण्यात येणार आहे. त्यामुळे हे नवे बदल प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू राज ठाकरेंना कितपत फलदायी ठरतात हे पाहावं लागेल.
=====================================
दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा!
मुंबई : शाळेत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर दर आठवड्याला सेल्फी काढावा लागणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून शाळांमधला दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा ठरणार आहे. पटपडताळणीसाठी शिक्षण विभागाने ही अनोखी शक्कल लढवली आहे.
देशातली 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत. त्यामुळे हजेरीची सातत्याने पडताळणी करण्यासाठी आधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्याने त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सोडण्यात आले आहेत.
शिक्षकांनी सोमवारच्या सकाळी प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून शासनाच्या ‘सरल’ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. इतकंच नाही, तर अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा आधारक्रमांक आणि त्यांच्यासोबतचा सेल्फीही शिक्षकांना ‘सरल’वर अपलोड करावे लागणार आहे.
वर्गातील मुलांची हजेरी आणि शिक्षकांनी दिलेल्या छायाचित्रातील तपशिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. जानेवारी 2017 पासून हा उपाय अमलात आणण्यात येणार आहे.
=====================================
VIDEO : लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू
मुंबई : स्टंटबाजीची नशा चढलेल्या एका तरुणाला लोकलच्या फुटबोर्डवर बसून स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. लोकलबाहेर लोंबकळताना रेल्वेमार्गावरील विजेच्या खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
जशी ट्रेन वेगात निघाली हा तरुण ट्रेनबाहेर झेपावला आणि तेव्हाच बाहेरच्या विजेच्या खांबाला धडकून खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यापैकी अनेकांचा स्वतःच्याच चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याचंही समोर आलं आहे.
23 सेकंदांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीनं त्याची चौकशी सुरु केली आहे. व्हिडिओत येणारा आवाज ऐकला तर ही लोकल मरिन लाईन्स आणि चर्नीरोड स्थानकाच्या मध्ये असल्याचं समजतं.
=====================================
यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे
लखनौ : भाजपने उत्तर प्रदेशात एक-दोन नव्हे, तर अर्धा डझन चेहरे मैदानात मुख्य प्रचारक म्हणून उतरवले आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक व्यक्तीकेंद्रीत न करण्याची भाजपची रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणाही केली जाणार नाही.
5 नोव्हेंबरला सहारनपूरमधून सुरु होणाऱ्या भाजपच्या परिवर्तन यात्रेमध्ये भाजपच्या प्रत्येक बॅनरवर सहा महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती, केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचेच फोटो प्रचारादरम्यान बॅनरवर असणार आहेत. एकंदरीत भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे फोटो बॅनरवर लावणं, हे अपरिहार्य होतं. मात्र, इतर चार नेत्यांचे फोटो लावण्यामागे भाजपचे जातीय समीकरण असल्याची चर्चा आहे. भाजप रणनीती आखूनच उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी मैदानात उतरलं आहे.
परिवर्तन यात्रेची सुरुवात 5 नोव्हेंबरपासून होणार आहे. सहारनपूरहून भाजपाध्यक्ष अमित शाह ही यात्रा सुरु करतील. त्यानंतर 6 नोव्हेंबरला झाँसीहून दुसरी यात्रा, 8 तारखेला सोनभद्रमध्ये तिसरी आणि 9 नोव्हेंबरला बलियाहून चौथी यात्री सुरु होईल. सर्व यात्रा 24 डिसेंबरला लखनौमध्ये येऊन थांबतील आणि तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
=====================================
समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदा भाजपला
नवी मुंबई: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांमधील भांडणानं उत्तरप्रदेशचं राजकारण बरंच बदललं आहे. याच बदलत्या राजकारणामुळं येथील मतदारांचा आता नेमका कल कुणाच्या बाजूनं आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सिसरोनं एक तात्काळ सर्व्हे केला आहे.
एबीपी न्यूज आणि सिसरोनं केलेल्या तात्काळ सर्व्हेनुसार मुख्यमंत्रीपदासाठई अखिलेश यादव यांना सर्वाधिक म्हणजेच 31 टक्के पसंती मिळाली आहे. तर मायावती यांना 27 टक्के पसंती मिळाली असून भाजपच्या आदित्यनाथ यांना 24 टक्के पसंती मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने पहिले काका पुतण्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सध्या तरी हे भांडणं शमलं असलं तरीही ऐन निवडणुकीच्या वेळेस काय होईल याबाबत काहीही सांगता येणार नाही.
=====================================
No comments:
Post a Comment