Thursday, 27 October 2016

नमस्कार लाईव्ह २७-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू 
२- पाक सैन्याच्या गोळीबारात 6 नागरिक जखमी 
३- इस्लामाबाद; गोल चपाती जमेना म्हणून बापानेच केली मुलीची हत्या 
४- भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी अधिका-याला दिल्लीतून अटक  
६- नॅनो कार तोट्याची, सायरस मिस्त्रींचा रतन टाटांवर हल्लाबोल 
७- टाटा समूहातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सेबीकडून चौकशी ? 
८- कच्छमध्ये जवानांना घेऊन जाणा-या बसला अपघात, १७ जवान जखमी. 
९- रामेश्वरम येथून तीन भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने केली अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- 'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला 
११- आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र 
१२- सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक 
१३- पेंग्विनला काँग्रेसची श्रद्धांजली, मनसेची लिंबू-मिरची फंडाची मागणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू 
१५- दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद 
१६- कल्याण; रखडलेल्या मालमत्ताकराची वसुली तृतीयपंथीयांकडून 
१७- अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील युवकामुळे पाच जणाला जीवदान 
१८- कल्याण: ३ मुलांना विष पाजून महिलेची आत्महत्या 
१९- रायगड किल्ल्यावरील रोप वे सेवा बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- तेजस ठाकरेंनी शोधलेल्या खेकड्यांच्या प्रजातीवर अभ्यासाची परवानगी 
२१- मिथुन चक्रवर्तीच्या पोशाखात चोरी करणारा अखेर गजाआड 
२२- परदेशी संघांना पाकमध्ये बोलावू नका- अख्तर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=======================================

'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास ठरावावरुन शिवसेनेने ‘सामना’तून थेट मुख्यमंत्र्यांवर वार केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमता आदर करावा, असं म्हणत, तुकाराम मुंढेंवरील अविश्वास ठराव तातडीने मंजूर करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला शिवसेनेने दिला आहे.
तुकाराम मुंढेंविरोधात 104 तर बाजूने 6 मतं पडली आहेत. त्यामुळे लोकशाहीत बहुमताला किंमत असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असं ‘सामना’त म्हटलं आहे.

=======================================

आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र

आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
मुंबई: नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तात्काळ बदली होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. काल नवी मुंबई महापालिकेत अविश्वास ठराव पास झाल्यानंतर आज मुंढेंनी थेट मंत्रालय गाठलं. नवी मुंबईत केलेल्या कारवाया आणि कामांबद्दल नगरविकास खात्याकडे अहवाल दिला आणि या अहवालाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयालाही दिली.

दुसरीकडे मुंढेंना हटवण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंढेंना हटवण्याची मागणी करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.


=======================================

सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू

सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू
दमिश्क : सीरियामधील इदलिब प्रातांत झालेल्या हवाई हल्ल्यात 22 विद्यार्थी आणि 6 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कट्टरपंथीयांच्या ताब्यातील हास गावात हा हल्ला झाला.
शाळेच्या आवारातच हवाई हल्ला झाल्याने मृतांमध्ये शाळकरी मुलं आणि शिक्षकांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यामागे रशियाच्या लढाऊ विमानांचा हात असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलवर या हल्ल्याची माहिती देताना म्हटलं आहे की, कट्टरपंथीयांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला असून, त्यात कट्टरपंथीय ठार झाले आहेत. मात्र शाळकरी मुलांच्या मृत्यूबाबत उल्लेख केलेला नाही.
दरम्यान, इदलिब परिसर कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे. याआधीही या परिसरात अनेकवेळा हवाई हल्ले झाले आहेत.

=======================================

सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू

सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला भीषण आग लागली. या  आगीत संपूर्ण यांत्रिकी विभाग जळून खाक झाला आहे. धक्कादायक म्हणजे आग विझवताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
निवृत्ती गांगुर्डे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. काल रात्री ही दुर्घटना घडली.

=======================================

दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद

दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर टोलवसुली बंद, महाराष्ट्रात कधी?
नवी दिल्ली : दिल्ली आणि नोएडा या दोन शहरांना जोडणारा डीएनडी फ्लायओव्हर टोलमुक्त करण्यात आला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने या उड्डाणपुलावर टोलवसुली करण्यास बंदी घातली आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे दिल्ली-नोएडा भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खर्चाची पूर्ण रक्कम वसूल झाल्यानंतरही टोलवसुली सुरु ठेवणं चुकीचं असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. 407 कोटींच्या खर्चाच्या बदल्यात 2200 कोटी रुपयांची टोलवसुली झाल्यानंतरही ती सुरु ठेवणं चुकीचं असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. अलाहाबाद कोर्टाचा हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येत आहे.
नोएडा अथॉरिटी आणि टोल ब्रिज कंपनीमध्ये झालेल्या मनमानी कराराचा फटका सामान्य वाहनचालकांना बसता कामा नये, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं. त्यामुळे यापुढे दिल्ली-नोएडा फ्लायओव्हरवर कोणतीही टोलवसुली केली जाणार नाही.
नोएडा-दिल्लीला जोडणाऱ्या सव्वाशे किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची निर्मिती 1997 साली सुरु झाली. निर्मितीसाठी जवळपास 407 कोटी रुपये खर्च आला होता. फेब्रुवारी 2001 मध्ये या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली. नोएडा टोल ब्रिज कंपनी टोलवसुली करणार होती. आतापर्यंत अंदाजे 2200 कोटी रुपये टोल वसूल झाल्याचा अंदाज लावला जात आहे.

=======================================

सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक

सायरस मिस्त्रींचा पलटवार, गोपनीय ई-मेल लिक
मुंबई: टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी पलटवार केला आहे. मिस्त्री यांनी टाटाच्या संचालक मंडळाला एक गोपनीय ई मेल करुन, आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात येतंय.
या पत्रात सायरस यांनी टाटा ग्रुपवर अनेक आरोप केले आहेत. तसंच आपल्याला कधीच कामाचं स्वातंत्र्य मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मिस्त्रींनी गोपनीय मेलमध्ये काय म्हटलंय?
“अचानक चेअरमनपदावरुन हटवल्यामुळे मला धक्का बसला आहे. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. हा निर्णय अवैध आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. चेअरमनपदी राहूनही मला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं नाही.  त्यामुळे चेअरमनपद कमकुवत झालं होतं. ज्याबाबत मला माहिती नव्हती, त्या कंत्राटांना मंजुरी देण्याचा अट्टाहास माझ्याकडे करण्यात आला. “, असं मिस्त्रींनी म्हटलं आहे.
 मला हटवल्याने टाटा ट्रस्टचं कौतुक होत नाही, तर टाटा आणि माझी स्वत:ची प्रतिमा मलिन झाली आहे, असंही मिस्त्रींनी म्हटलं आहे. 2012 मध्ये मला कार्यकारी संचालकपदावरुन चेअरमन बनवलं, तेव्हा किती गंभीर समस्या वारसा हक्काने मिळणार आहेत याचा अंदाज नव्हता, असं मिस्त्रींनी नमूद केलं आहे.
युरोपात टाटा स्टीलचा प्लांट विकण्याच्या सायरस यांच्या निर्णयाला टाटा परिवाराचा विरोध होता. टाटा परिवाराला कंपनीच्या जागतिक विस्ताराची अपेक्षा होती.

=======================================

अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील युवकामुळे पाच जणाला जीवदान

कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उध्दव मोरे (25) हा मोटारसायकलने नायगाव येथे मावस बहिणीला भेटून परतत असताना मारतळा येथे टिपरला धडकल्याने मेंदूस गंभीर दुखापत झाली आणि युवक कोमात गेला. नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चिंताजनक परिस्थितीमुळे त्यांची पत्नी भाग्यश्री हिने अवयवदानाच्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने जिल्ह्यातून होणाऱ्या अवयवदानाच्या संकल्पात कंधार तालुक्यातील या युवकामुळे पाच जणाला जीवदान मिळणार आहे.

शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेले पानशेवडी गावाची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. तेथील जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले शारजाबाई व उध्दव संताजी मोरे यांना दोन मुले. मोठा बापूजी हा पुणे येथील खाजगी कंपनीत कार्यरत असून, दुसरा संतोष हा आपले दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील संत नामदेव महाराज माध्यमिक विद्यालयात तर पुढील शिक्षण शेकापूर व त्यानंतर आयटीआय ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था नेहरुनगर येथे घेतले. त्यानंतर त्याने माझगाव डॉर्कयार्ड मुंबई येथे एका खाजगी कंपनीत टेक्नीशियन म्हणून नोकरी सुरु केली. दरम्यान 2012 मध्ये गावात झालेल्या लग्न मेळाव्यात केकतशिदगी येथील दळवे कुटुंबियातील भाग्यश्री हिच्याशी हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न झाले. पनवेल येथे आनंदाने हे दांपत्य राहात असताना चार वर्षानंतर त्यांना संतती प्राप्तीचा योग आला. 30 ऑक्टोबरला नांदेडच्याप्रसूतीसाठी भाग्यश्री माहेरी तर संतोष सुध्दा प्रसूतीसाठी सुटी घेवून गावाकडे आला होता. गावात आल्यानंतर नातेवाईकांना भेटी घेणे सुरु असताना 24 रोजी तो व मामाचा मुलगा ज्ञानेश्र्वर आनकाडे हे नायगाव येथे मावस बहिणीला भेटून गोपाळचावडी येथे आत्याला भेटण्यासाठी जात असताना मारतळा येथे उभ्या टिपरला धडक बसल्याने संतोष जागीच बेशुद्ध झाला तर ज्ञानेश्र्वरला किरकोळ मार लागला. ही बातमी समजताच मारतळा येथील नातेवाईकांनी संतोषला नांदेडच्या लोटस या खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर दुखापतीमुळे संतोष व्हेटींलेटरवर होता. उपचारार्थ कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही बाब पत्नी भाग्यश्रीला सांगण्यात आली. ती गरोदर असल्याने तिने आपल्या पतीची अवस्था पाहून रक्तदाब वाढल्याने तिला सुध्दा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नातेवाईकांच्या व सासु-सासऱ्याच्या सांगण्यावरुन तिने आपल्या पतीचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यानुसार कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. 
=======================================

No comments: