Wednesday, 12 October 2016

नमस्कार लाईव्ह १२-१०-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पम्पोरमध्ये 57 तासांनंतर ऑपरेशन संपलं, 2 दहशतवाद्यांचा खात्मा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी जनतेचं, कुठल्याही एका पक्षाचं नाही : पर्रिकर 
३- बारामती हॉस्टेलमध्ये घुसून पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न 
४- 'दुश्मन शिकार, हम शिकारी', LOCवर जवानांच्या घोषणा 
५- भारताला युद्धाची गरज नाही, यामुळे अर्थव्यवस्था बिघडली जाऊ शकते - संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे 
७- बीड; जानकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादी-रासप कार्यकर्त्यांमध्ये घमासान 
८- भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुंगात रवानगी 
९- प्रज्ञा पवार आणि रावसाहेब कसबेंवर गुन्हा दाखल करा : शिवसेना 
१०- कृपाशंकर सिंगप्रकरणी सरकारनं दोन आठवड्यांत अहवाल सादर करावा- हायकोर्ट 
११- रायगड - सरकारच्या डोक्यावर बसा, रस्ते दुरुस्त करुन घ्या - उद्धव ठाकरें 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- नागपूर; अमेझॉनला चोरट्यांचा झटका, 60 लाखांच्या वस्तू असलेला ट्रक पळवला! 
१४- अहमदनगर - पाईपलाईन रोडवरील साईश्रध्दा कॉलनीत चार कार फोडल्याचे वृत्त. 
१५- बिहार- बक्सरमध्ये मूर्ती विसर्जनादरम्यान चार तरुण बुडाले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- रविनामुळे 'त्या' चिमकलीला भेटले आई-वडील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी जनतेचं, कुठल्याही एका पक्षाचं नाही : पर्रिकर

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी जनतेचं, कुठल्याही एका पक्षाचं नाही : पर्रिकर
नवी मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय 127 कोटी भारतीय जनतेला जातं, कुणा एका राजकीय पक्षाला याचं श्रेय जात नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले. नवी मुंबईतील एका परिषदेच्या उद्घाटनादरम्यानच्या भाषणात पर्रिकर बोलत होते.
“सध्या सर्जिकल स्ट्राईकच्या श्रेयावरुन वाद सुरु आहे. पण मला इथे आवर्जून सांगावासं वाटतं की, सर्जिकल स्ट्राईकचं संपूर्ण श्रेय देशातील 127 कोटी जनतेला जातं. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय जात नाही. मात्र, सर्जिकल स्ट्राईकच्या एकंदरीत निर्णय प्रक्रियेतील भाग म्हणून पंतप्रधान मोदी आणि मलाही यातलं थोडं श्रेय जातं.”, असे संरक्षमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले.
यावेळी, राजकारण आणि सैन्याची प्रकरणं यांची सरमिसळ करु नये, असे सांगताना पर्रिकर असेही म्हणाले की, लोकांचं सर्जिकल स्ट्राईकबाबत भावनिक प्रतिक्रिया समजू शकतो.

=====================================

No comments: