[अंतरराष्ट्रीय]
१- VIDEO: पॅराशूटशिवाय ल्यूकने घेतली २५ हजार फुटांवरून उडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानं गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ : शरद पवार
३- पेट्रोल १.४२ तर डिझेल २.१ रुपयाने स्वस्त
४- मोदींना प्रश्न करून सुशिक्षित बेरोजगाराची आत्महत्या !
५- उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण 'जंगलराज': मायावती
६- मायावतीच भाजपच्या गुलाम: आठवले
७- पर्रीकरांना प्रत्येकाला शिकवायचा आहे धडा: राहुल
८- डिजीटल फसवणुकीपासून सावध रहा- मोदी
९- १३ बँकांना २७ कोटी दंड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
११- राज्यभरातही पाणीच पाणी चहूकडे
१२- मुंबई-ठाण्यात पाऊसफुल्ल, रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सेल्फीच्या नादात तलावात बुडून युवा अॅथलीट पूजा कुमारीचा मृत्यू
१४- डिसेंबर 2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार: मुख्यमंत्री
१५- लातूरमध्ये ओढ्याच्या पुरात कार वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू
१६- मध्य रेल्वे विस्कळीत, पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी
१७- पालक सभेनंतर 11 वर्षाच्या मुलीची आत्महत्या
१८- आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- भारताचे दमदार प्रत्युत्तर, १ बाद १२६ के. एल. राहुलच्या नाबाद ७५ धावा
२०- देशविरोधी बोलण्याची हिंमतच कशी होते?, संरक्षणमंत्र्याने आमीर खानला फटकारले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये
8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
========================================





रेणापूर तालुक्यातील हनमंतवाडी येथे ओढ्यात कारमध्ये चौघे जण अडकले होते. त्यावेळी आलेल्या पुरात वाहून गेल्याने चौघांचाही मृत्यू झाला. 45 वर्षीय ज्ञानोबा अनंत गिते आणि इतर तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सकाळी पाणी ओसरल्यावर ही घटना उघड झाली.


सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची जलद वाहतूक सध्या धीम्या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.
रविवार असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा टळलेला असला तरी पावसात बाहेर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.


१- VIDEO: पॅराशूटशिवाय ल्यूकने घेतली २५ हजार फुटांवरून उडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानं गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ : शरद पवार
३- पेट्रोल १.४२ तर डिझेल २.१ रुपयाने स्वस्त
४- मोदींना प्रश्न करून सुशिक्षित बेरोजगाराची आत्महत्या !
५- उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण 'जंगलराज': मायावती
६- मायावतीच भाजपच्या गुलाम: आठवले
७- पर्रीकरांना प्रत्येकाला शिकवायचा आहे धडा: राहुल
८- डिजीटल फसवणुकीपासून सावध रहा- मोदी
९- १३ बँकांना २७ कोटी दंड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
११- राज्यभरातही पाणीच पाणी चहूकडे
१२- मुंबई-ठाण्यात पाऊसफुल्ल, रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सेल्फीच्या नादात तलावात बुडून युवा अॅथलीट पूजा कुमारीचा मृत्यू
१४- डिसेंबर 2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार: मुख्यमंत्री
१५- लातूरमध्ये ओढ्याच्या पुरात कार वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू
१६- मध्य रेल्वे विस्कळीत, पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी
१७- पालक सभेनंतर 11 वर्षाच्या मुलीची आत्महत्या
१८- आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- भारताचे दमदार प्रत्युत्तर, १ बाद १२६ के. एल. राहुलच्या नाबाद ७५ धावा
२०- देशविरोधी बोलण्याची हिंमतच कशी होते?, संरक्षणमंत्र्याने आमीर खानला फटकारले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये
8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
========================================
भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला. सकाळी साडे 9 च्या सुमारास शहरातल्या गैबी नगर भागातली एक इमारत कोसळली. ज्याखाली किमान 30 ते 35 जण अडकले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं… पण त्याआधीच 8 जणांचा मृत्यू झाला.
दुर्दैवाची गोष्ट ही की एकाच कुटुंबातल्या तीन भावांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 10 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर भिवंडीतल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे.
दरम्यान भिवंडीतल्या या घटनेनं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरवणीवर आला आहे
दुर्दैवाची गोष्ट ही की एकाच कुटुंबातल्या तीन भावांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 10 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर भिवंडीतल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे.
दरम्यान भिवंडीतल्या या घटनेनं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरवणीवर आला आहे
========================================
सेल्फीच्या नादात तलावात बुडून युवा अॅथलीट पूजा कुमारीचा मृत्यू
भोपाळ : भारताची युवा अॅथलीट पूजा कुमारीला सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव गमवावा लागलाय. भोपाळच्या स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात साईच्या परिसरात ही घटना घडली.
पाणी अडवण्यासाठी बनवलेल्या तलावाजवळ पूजा आणि तिच्या दोन सहकारी सेल्फी काढत होत्या. तेव्हा अचानक पूजाचा पाय घसरल्यानं ती पाण्यात पडली. तलावात बुडून पूजाचा मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा शनिवारी संध्याकाळी अॅथलेटिक्स टँकहून आपल्या नेहमीच्या सरावानंतर वसतिगृहात परतत होती. तिच्यासोबत नेहा आणि प्रिती नावाच्या दोन अन्य खेळाडूही होत्या.
परतत असताना रस्त्यात साईट सेंटर परिसरादरम्यान तलावात पूजा आणि तिच्या सहकारी खेळाडूंनी काही मासे पाहिले. माशांसोबत सेल्फी काढण्यासाठी तिघीही तलावाजवळ गेल्या. सेल्फी काढण्याच्या नादात पूजाचा पाय घसरला आणि ती तलावात पडली.
20 वर्षांची पूजा कुमारी ही स्टीपलचेस प्रकारातली धावपटू होती. गेल्या तीन वर्षांपासून पूजा ही भोपाळमध्येच राहत होती.
========================================
डिसेंबर 2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार: मुख्यमंत्री
नागपूर : डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करु, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते.
राज्यात एकूण 29 हजार ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करु, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, प्रायोगिक तत्वावर राज्यातील काही निवडक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून तिथे सरकारच्या सर्व सेवा डिजिटल स्वरूपात पुरवल्या जात आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
डिसेंबर 2018 पर्यंत संपूर्ण राज्यात डिजिटल सेवांचा विस्तार करू असे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामपंचायती डिजिटल झाल्यास त्याचा लाभ अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण भागातील सर्व शासकीय सोयींसाठी होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
========================================
राज्यभरातही पाणीच पाणी चहूकडे
मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वच भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कोकण किनारपट्टीसह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच विदर्भातही अनेक नद्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये काल रात्री मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अवघ्या २ तासात चंद्रपूर शहरात १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे 3 दरवाजे 0.25 मीटरनी उघडण्यात आलेत आहेत. धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहत आहे.
========================================
लातूरमध्ये ओढ्याच्या पुरात कार वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू
लातूर : लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे लातूरचा पाणीप्रश्न मिटला असला तरी जनजीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. ओढ्यात कार वाहून गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.
रेणापूर तालुक्यातील हनमंतवाडी येथे ओढ्यात कारमध्ये चौघे जण अडकले होते. त्यावेळी आलेल्या पुरात वाहून गेल्याने चौघांचाही मृत्यू झाला. 45 वर्षीय ज्ञानोबा अनंत गिते आणि इतर तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सकाळी पाणी ओसरल्यावर ही घटना उघड झाली.
========================================
मुंबई-ठाण्यात पाऊसफुल्ल, रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई / ठाणे : मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात गेल्या काही तासांपासून धुंवाधार पाऊस सुरु आहे.सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या उपनगरांतील अनेक भागात पाणी साचलं आहे.
सूर्यदर्शन टॉवरमागील भिंत कोसळली :
ठाण्यात पावसामुळे नितीन कंपनीजवळ सूर्यदर्शन टॉवर कंपनी जवळ इमारतीची भिंत कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही भिंत कोसळल्यामुळे परिसराती काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
========================================
मध्य रेल्वे विस्कळीत, पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : जोरदार पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी आणि माती आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची जलद वाहतूक सध्या धीम्या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.
रविवार असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा टळलेला असला तरी पावसात बाहेर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.
========================================
न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानं गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ : शरद पवार
अहमदनगर: कोपर्डी घटनेतील पीडितेच्या कुटुबीयांची आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत, न्यायालयीन प्रक्रियेवर ताशेरे ओढले. न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानेच गुन्हेगारी वाढली असल्याचे मत पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
पवार म्हणाले की, ”कोपर्डीसारख्या अमानवी घटना रोखण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं पुर्ण करायला हवी. दिल्लीतील घटनेनंतर जसा खटला जलदगतीने चालला, तसेच याही घटनेचा निवाडा जलदगती न्यायालयात व्हायला हवा. तरच गुन्हेगारांना चाप बसेल.”
यावेळी त्यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्यांवरही अक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, ”काही लोक कायद्याबद्दल बोलत आहेत. परंतु कायदा बदलणे, हे काही एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हातात नाही. त्यासाठी संसदेमध्ये चर्चा व्हावी लागते, त्यावर एकमत व्हाव लागतं. समोरच्या बाजूचं म्हणणं एकून घ्यावं लागत.”
यावेळी त्यांनी कोपर्डी ग्रामस्थांचेही कौतुक केले. ”या गावाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे. काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांना या गावात येण्यास मनाई करण्यात आली असे सांगण्यात आलं. परंतु, मला तरी येथे येण्यास कोणाचाही विरोध झाला नाही.”
========================================
पालक सभेनंतर 11 वर्षाच्या मुलीची आत्महत्या
नवी दिल्ली: शनिवारी दिल्ली सरकारने सर्वच शाळांमध्ये पालक सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेनंतर एका 11 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे.
पश्चिम दिल्लीच्या ख्याला भागातील करिश्मा या 11 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. शाळेने तिच्या घरच्यांकडे केलेल्या तक्रारीने घाबरून, तिने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.
करिश्माची आई शाहजहा काल सकाळी पालक सभेला जात होती. त्यावेळी तिने करिश्माला सोबत येण्यास सांगितले. मात्र, ती या सभेला जाण्यास तयार नव्हती. तिच्या पालकांनी जर त्यावेळीच यामागचे कारण विचारले असते, तर तिचा जीव वाचला असता.
========================================
पेट्रोल १.४२ तर डिझेल २.१ रुपयाने स्वस्त
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३१ : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल विपणन कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १ रुपया ४२ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १० पैशांनी कपात जाहीर केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीनंतर लागू होतील.तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.
========================================
VIDEO: पॅराशूटशिवाय ल्यूकने घेतली २५ हजार फुटांवरून उडी
- ऑनलाइन लोकमतलॉस एंजिलिस, दि. ३१ : ल्यूक आयकिन्स (४२) या धाडसी व्यक्तिने शनिवारी पॅराशूटचा आधार न घेता २५ हजार फूट (७,६२० मीटर) उंचीवरून उडी घेऊन जाळीमध्ये सुखरूप उतरून इतिहास घडविला. दक्षिण कॅलिफोर्नियातील व लॉस एंजिलिसच्या पश्चिमेस सिमी व्हॅलीत हा धाडसी प्रयोग झाला. ल्यूकच्या नावावर तब्बल १८ हजार उड्यांचा अनुभव आहे.ल्यूक १०० फूट बाय १०० फूट (३० मीटर बाय ३० मीटर) आकाराच्या जाळीत उतरला. अशा धाडसी उड्या घेण्यामध्ये त्याने २६ वर्षांपासून करिअर केले आहे. ही उडी त्याची सर्वात उंचीवरील व पॅराशूट किंवा विंगसूूट न घेता वैयक्तिक आणि जागतिक विक्रम ठरली आहे, असे त्याचा प्रवक्ता जस्टीन अॅक्लिन यांनी ई मेलद्वारे कळविले.विमानाच्या साहाय्याने त्याने ही उडी घेतली. जमिनीवर येताना त्याचा वेग जवळपास ताशी 193 किमी होता. ल्यूकची ही कामगिरी पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि कुटुंबीय त्याठिकाणी उपस्थित होते. ल्यूकने आयर्नमॅन 3 चित्रपटातही भूमिका केलेली आहेखूप उंचीवर असल्यामुळे ल्यूकने प्राणवायूचा मुखवटा लावला होता. एका विमानातून त्याने व अन्य तीन पॅराशूटर्सनी खाली झोकून दिले. नंतर त्याने तिघांपैकी एकाच्या हाती प्राणवायुचा मुखवटा दिला. नंतर तीन पॅराशूटर्स ल्यूकपेक्षा वर उडत होते व ल्यूक एकटाच खाली येत होता. ल्यूकची ही उडी दोन मिनिटे चालली.
========================================
मोदींना प्रश्न करून सुशिक्षित बेरोजगाराची आत्महत्या !
- ऑलाइन लोकमतयवतमाळ, दि. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्न करून आणि त्यावर विचार करण्याचे सांगून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने विष प्रशन करून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याच्या मारवाडी येथे शनिवारी घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने युवकांना भविष्य घडविण्याचा संदेशही लिहिला आहे. गोपाल बाबाराव राठोड (२२) असे त्याचे नाव आहे.वडिलांच्या नावावर असलेली तीन एकर शेती सांभाळून गोपाल हा बोरीअरब येथील कला-वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. व्दितीय वर्षाला शिकत होता. गतवर्षी तो याच महाविद्यालयाच्या आणि नेर येथे वास्तव्याला असलेल्या एका प्राध्यापकाच्या संपर्कात आला. त्यांनी गोपालला शेळीपालनाचा व्यवसाय उभा करून दिला. तेथून १५ दिवसानेच अर्थात शनिवारी सायंकाळी ७ वाजता गोपाल हा या प्राध्यापकाच्या घरी पोहोचला.त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच तत्काळ रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला हलविले. उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला. गोपालने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ह्यमोदीजी इस सवाल पर बहुत ज्यादा गौर करोह्ण असे सांगून अनेक प्रश्न उपस्थित केले. विविध खेळांच्या चमुमध्ये श्रीमंतांची मुले आहेत. पण ज्यांच्या कष्टामुळे दोन वेळेचे जेवण मिळते त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करावे, अभियांत्रिकीला प्राध्यापकांची मुले एक लाख रुपये भरू शकतात पण शेतकऱ्यांची मुले महाविद्यालयाची फी भरू शकत नाही, त्यांनी काय करावे.व्यवसायासाठी कर्ज मागितले तर बँका संपत्ती गहाण ठेवायला सांगतात, ज्यांच्याकडे संपत्ती नाही त्यांचे काय, वेतन घेणाऱ्यांना न मागता महागाई भत्ता मिळतो, पण शेतकऱ्यांना भाव मागता मागता कमी होतो असे का, पोलिसात चौकशी शिवाय गुन्हा दाखल होतो हा कुठला नियम आहे, रोजगारासाठी आॅटोरिक्षा चालविणाऱ्यांना पोलिसांना हप्ता द्यावा लागतो, असे का याप्रकारचे प्रश्न गोपालने उपस्थित केले आहे.कोणाला आपण सुख देऊ शकत नाही तर कमीतकमी दु:ख तरी देऊ नका, त्या जीवनात कुणीही कुणाचे नाही, मेहनत करा आणि स्वत:चे भविष्य घडवा, असा संदेश देणारी चिठ्ठीही त्याने लिहून ठेवली आहे. शेवटी नाव आणि स्वाक्षरी करून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर विचार करावा असे म्हटले आहे. चिठ्ठीच त्याने आई, वडील, भाऊ आणि बहिणींची माफी मागितली आहे. सदर युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.वडिलोपार्जीत शेतावर कर्जगोपाल बाबाराव राठोड याच्या वडिलोपार्जीत तीन एकर शेतावर युनीयन बँकेचे ७० हजार आणि खासगी एक लाख ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. मागील अनेक वर्षांपासूनची नापिकी यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. यातूनच गोपालने आत्महत्या केली असावी, असे सांगितले जाते.
========================================
उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण 'जंगलराज': मायावती
| |
-
| |
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये मायलेकींवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर बोलताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये संपूर्णपणे ‘जंगलराज‘ असल्याची टीका केली आहे.
दिल्ली-कोलकाता महामार्गावर शहाजहांपूर येथे शुक्रवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने एका मोटारीला अडवून लुट करत मायलेकींवर सामुहिक बलात्कार केला. या घटनेनंतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना मायावती म्हणाल्या, ‘समाजवादी पक्ष नागरिकांना विशेषत: महिलांना सुरक्षा पुरविण्यात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. राज्यात गुन्हेगार खुलेआमपणे फिरत असून संपूर्णपणे "जंगलराज‘ आहे.‘ तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही मायावती यांनी यावेळी केली.
दिल्ली-कोलकाता महामार्गावर शहाजहांपूर येथे शुक्रवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने एका मोटारीला अडवून लुट करत मायलेकींवर सामुहिक बलात्कार केला. या घटनेनंतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना मायावती म्हणाल्या, ‘समाजवादी पक्ष नागरिकांना विशेषत: महिलांना सुरक्षा पुरविण्यात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. राज्यात गुन्हेगार खुलेआमपणे फिरत असून संपूर्णपणे "जंगलराज‘ आहे.‘ तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही मायावती यांनी यावेळी केली.
========================================
आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा मृत्यू
| |
-
| |
अहमदाबाद - उना येथे गोमांस बाळगल्यावरून दलित कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा आज मृत्यू झाला.
योगेश सारीखाडा असे राजकोटमधील राहणाऱ्या मृत युवकाचे नाव आहे. योगेशने 19 जुलै रोजी आंदोलनादरम्यान विष प्राशन केले होते. त्या वेळी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात त्याला हलविण्यात आले होते. त्या वेळी त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर गुजरातमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
योगेश सारीखाडा असे राजकोटमधील राहणाऱ्या मृत युवकाचे नाव आहे. योगेशने 19 जुलै रोजी आंदोलनादरम्यान विष प्राशन केले होते. त्या वेळी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात त्याला हलविण्यात आले होते. त्या वेळी त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर गुजरातमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
========================================
नवी दिल्ली - मी नव्हे तर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या भारतीय जनता पक्षाच्या गुलाम असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
मायावती यांनी बुद्ध धर्म स्वीकारला नसल्याबद्दल आठवले यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मायावती यांनी आठवले हे भारतीय जनता पक्षाचे गुलाम असून ते दलितांची मते विभाजित करत असल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले, "मी मायावती यांचा आदर करतो. मात्र मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मी केवळ युतीत आहे म्हणून भाजपचा गुलाम नाही. त्या स्वत:च भाजपच्या तीन वेळा गुलाम होत्या. भाजपचा पाठिंबा घेऊन त्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत.‘ दलितांची मते विभाजित करत असल्याच्या आरोप फेटाळून लावत आठवले यांनी आपण समर्पित भावनेने दलितांची सेवा करत असल्याची म्हटले आहे.
मी नव्हे; मायावतीच भाजपच्या गुलाम: आठवले
| |
-
| |
मायावती यांनी बुद्ध धर्म स्वीकारला नसल्याबद्दल आठवले यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मायावती यांनी आठवले हे भारतीय जनता पक्षाचे गुलाम असून ते दलितांची मते विभाजित करत असल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले, "मी मायावती यांचा आदर करतो. मात्र मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मी केवळ युतीत आहे म्हणून भाजपचा गुलाम नाही. त्या स्वत:च भाजपच्या तीन वेळा गुलाम होत्या. भाजपचा पाठिंबा घेऊन त्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत.‘ दलितांची मते विभाजित करत असल्याच्या आरोप फेटाळून लावत आठवले यांनी आपण समर्पित भावनेने दलितांची सेवा करत असल्याची म्हटले आहे.
========================================
पर्रीकरांना प्रत्येकाला शिकवायचा आहे धडा: राहुल
| |
-
| |
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना देशातील प्रत्येकाला धडा शिकवायचा असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

"संघ आणि पर्रीकरजी यांना प्रत्येकाला धडा शिकवायचा आहे.‘ असे म्हणत गांधी यांनी संघ आणि पर्रीकर यांना एक धडा दिला आहे. "तुमच्यासाठी एक धडा: भित्रे लोक द्वेष करतात आणि द्वेषाचा कधीही विजय होत नाही‘, असा धडा गांधी यांनी दिला आहे. "देशाच्या राजधानीत बसून देशाच्या विरोधात बोलण्याची लोकांची हिंमत होतेच कशी?‘, असा प्रश्न पर्रीकर यांनी शनिवारी पुणे येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला होता. तसेच भविष्यात देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असेही ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली.
"संघ आणि पर्रीकरजी यांना प्रत्येकाला धडा शिकवायचा आहे.‘ असे म्हणत गांधी यांनी संघ आणि पर्रीकर यांना एक धडा दिला आहे. "तुमच्यासाठी एक धडा: भित्रे लोक द्वेष करतात आणि द्वेषाचा कधीही विजय होत नाही‘, असा धडा गांधी यांनी दिला आहे. "देशाच्या राजधानीत बसून देशाच्या विरोधात बोलण्याची लोकांची हिंमत होतेच कशी?‘, असा प्रश्न पर्रीकर यांनी शनिवारी पुणे येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला होता. तसेच भविष्यात देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असेही ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली.
========================================
डिजीटल फसवणुकीपासून सावध रहा- मोदी
| |
-
| |
नवी दिल्ली - खोटी आमिषे आणि अवास्तव लाभ दाखवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या "डिजीटल फसवणुकी‘पासून दूर राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात‘ या कार्यक्रमाद्वारे केले.
रेडिओद्वारे देशवासियांशी संवाद साधण्याच्या "मन की बात‘ या कार्यक्रमाचा आज 22 वा भाग होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "खोटी आमिषे आणि अवास्तव लाभ दाखवणारे ई-मेल आपण टाळायला हवेत.‘ तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेला हा एक दरोडाच असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी कल्पना, सूचना आणि विषय सुचविण्यात आवाहन करताना मोदी म्हणाले, "स्वतंत्र भारतात जन्मलेला मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे. येत्या 15 ऑगस्टला मी देशाला संबोधित करणार आहे. माझ्या भाषणासाठी मला तुमच्याकडून काही सूचना, कल्पना, विषय हवे आहेत. कृपया तुमच्या कल्पना मोबाईल ऍपवर किंवा "मायगव्ह‘वर शेअर करा.‘

मोदी यांच्या "मन की बात‘मधील ठळक बाबी -
रेडिओद्वारे देशवासियांशी संवाद साधण्याच्या "मन की बात‘ या कार्यक्रमाचा आज 22 वा भाग होता. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "खोटी आमिषे आणि अवास्तव लाभ दाखवणारे ई-मेल आपण टाळायला हवेत.‘ तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेला हा एक दरोडाच असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी कल्पना, सूचना आणि विषय सुचविण्यात आवाहन करताना मोदी म्हणाले, "स्वतंत्र भारतात जन्मलेला मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे. येत्या 15 ऑगस्टला मी देशाला संबोधित करणार आहे. माझ्या भाषणासाठी मला तुमच्याकडून काही सूचना, कल्पना, विषय हवे आहेत. कृपया तुमच्या कल्पना मोबाईल ऍपवर किंवा "मायगव्ह‘वर शेअर करा.‘
मोदी यांच्या "मन की बात‘मधील ठळक बाबी -
- जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नाही. मात्र ऑलिंपिकपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायला हव्यात.
- प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानांतर्गत गर्भवती महिलांसाठी आम्ही विनामूल्य वैद्यकीय तपासणीची योजना सादर करत आहोत. दर महिन्याच्या नऊ तारखेला महिलेची विनामूल्य वैद्यकीय तपासणी केली जाईल. या योजनेला हजारो डॉक्टरांनी सहमती दर्शविली असून लाखो डॉक्टरांनी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
- वृक्षारोपणाच्या भव्य चळवळीत सहभागी व्हा. राजस्थान सरकारने 25 लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे.
========================================

