सोनियामुळे स्वच्छ व अतिक्रमण मुक्त नांदेड दिसणार का? - श्रीकांत बाहेती
कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोसर्वा मा. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच कोंग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत शामिल असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते उद्या नांदेड शहरात येणार आहेत. त्यांना सलामी देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानी असलेले कॉंग्रेस पक्षाच्या नाकर्तेपणाचा पुरावा म्हणून अतिक्रमणाच्या विलाख्यातील नांदेड शहर. वाहतुकीचा वाजलेला बोजवारा व स्वच्छतेअभावी बकाल झालेले नांदेड शहर उत्साहाने सजत आहे. नांदेड शहराचे भाग्यविधाते कर्तव्याचे महानेरू माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सैनिक कै. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण व संग्रहालयाचे उद्घाटन उद्या सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
शंकररावजी यांच्या कर्तव्याची व दूरदृष्टीची फळे नांदेडकर चाखत आहेत. यामुळे दुष्काळातही नांदेडची अवस्था झाली नाही. विष्णुपुरी प्रकल्प हे त्यांचे साक्षीचे उदाहरण आहे. अशा कर्मठ, कर्मयोगी महात्म्याच्या शहरात त्यांच्याच पक्षाच्या अधिपत्याखाली व पक्षाची सर्व सत्तास्थाने आहेत. परंतु शहरात अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे. स्वच्छते अभावी शहराला बकाल अवस्था आलेली आहे. यामुळे आता झालेल्या पावसात बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबण्याचे प्रकार दिसून आले तर शहरात वाहतूक व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.
अशावेळी नांदेडकरांच्या गळतील ताईत असलेले, अपेक्षेच्या हृदयस्थानी असलेले अशोकराव चव्हाण साहेब यांनी लक्ष घालावे ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. जर अशोकरावांच्या कार्यक्रमाला अशी अवस्था तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा विचार कोणी करेल काय?
कॉंग्रेस पक्षाच्या सर्वोसर्वा मा. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच कोंग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत शामिल असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते उद्या नांदेड शहरात येणार आहेत. त्यांना सलामी देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानी असलेले कॉंग्रेस पक्षाच्या नाकर्तेपणाचा पुरावा म्हणून अतिक्रमणाच्या विलाख्यातील नांदेड शहर. वाहतुकीचा वाजलेला बोजवारा व स्वच्छतेअभावी बकाल झालेले नांदेड शहर उत्साहाने सजत आहे. नांदेड शहराचे भाग्यविधाते कर्तव्याचे महानेरू माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सैनिक कै. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण व संग्रहालयाचे उद्घाटन उद्या सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
शंकररावजी यांच्या कर्तव्याची व दूरदृष्टीची फळे नांदेडकर चाखत आहेत. यामुळे दुष्काळातही नांदेडची अवस्था झाली नाही. विष्णुपुरी प्रकल्प हे त्यांचे साक्षीचे उदाहरण आहे. अशा कर्मठ, कर्मयोगी महात्म्याच्या शहरात त्यांच्याच पक्षाच्या अधिपत्याखाली व पक्षाची सर्व सत्तास्थाने आहेत. परंतु शहरात अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे. स्वच्छते अभावी शहराला बकाल अवस्था आलेली आहे. यामुळे आता झालेल्या पावसात बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबण्याचे प्रकार दिसून आले तर शहरात वाहतूक व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.
अशावेळी नांदेडकरांच्या गळतील ताईत असलेले, अपेक्षेच्या हृदयस्थानी असलेले अशोकराव चव्हाण साहेब यांनी लक्ष घालावे ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. जर अशोकरावांच्या कार्यक्रमाला अशी अवस्था तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा विचार कोणी करेल काय?

No comments:
Post a Comment