Monday, 5 September 2016

नमस्कार लाईव्ह ०५-09-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[आंतरराष्ट्रीय]
१- मदर तेरेसा यांना संतपद बहाल
२- भारत-चीनने परस्परांच्या इच्छांचा आदर करावा - पंतप्रधान मोदी
३- काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट
==========================
[राष्ट्रीय]
४- गणेशोत्सवानिमित्त ट्विटरकडून गणरायाचे इमोजी
५- भगवान विष्णूंच्या फोटो प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा 
६- विश्व हिंदू परिषद सांगते 'गो तस्करांना मारा, पण हाडं तोडू नका'
७- आज सलिल चौधरी यांची पुण्यतिथी
८- सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस
९- हामिद करझाई भारतात बनले चौथ्यांदा पिता! 
=========================
[राज्य]
१०- मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीची कोंडी
११- अवघी मुंबापुरी झाली ‘बाप्पा’मय...
१२- राजन निवृत्त, आता सूत्रे ऊर्जित पटेलांकडे
१३- मदर तेरेसांना संतपद बहाल !
१४- आमच्यात लक्ष घालू नका!
१५- घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून
१६- दोन आठवड्यांनंतर बाजारात तेजीचा संचार
१७- अष्टविनायका, टॅक्स आॅडिटचा महत्त्वाचा ‘अष्ट’महिमा कोणता?
१८- कृषी कंपन्यांवर तेजीचा ‘पाऊस’
१९- रिझर्व्ह बँकेला नकाराधिकार हवाच
२०- डाळी पुन्हा कडाडल्या!
२१- सेन्सेक्सचा १६ महिन्यांचा उच्चांक
=========================
प्रादेशिक]
२२- कोसबाड येथे जागतिक नारळ दिन साजरा 
२३- मायावती या 'हावरट कुत्र्यासारख्या - दयाशंकरसिंह 
२४- मृत चिमुकलीसह माता रात्रभर रुग्णालयाबाहेर 
२५- खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक 
=========================
[इतर]
२६- आमीर आणि अमिताभ पहिल्यांदा एकत्र काम करणार 
२७- आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले
२८- एकाच वेळी रॅम्पवर अवतरले क्रिकेट-बॉलिवूड जगत
२९- विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळाचा बॅडमिंटनपटूंना फटका
३०- सुनील छेत्री प्रतिभावान खेळाडू...
31- अ‍ॅण्डी मरेची विजयी घोडदौड!
३२- स्वच्छ भारत मोहिमेबरोबर सिंधू, साक्षी, दीपा जोडण्याची शक्यता
===========================
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
==================================================

गणेशोत्सवानिमित्त ट्विटरकडून गणरायाचे इमोजी

  • First Published :05-September-2016 : 10:00:00Last Updated at: 05-September-2016 : 10:22:16

  • - ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 5 - गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्त सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देत असतात, आपल्या भावना व्यक्त करत असतात. अशा गणेशभक्तांसाठी ट्विटर इंडियाने खास भेट दिली असून आठ इमोजी लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे मराठीमध्ये हॅशटॅगही देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशभक्त हॅशटॅग आणि इमोजी एकत्र ट्विट करु शकतील. ट्विटरने याआधी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि दिवाळीतही स्पेशल इमोजी हॅशटॅग लॉन्च केले होते.
     
    ट्विटर इंडियाने गणेशोत्सव हॅशटॅग आणि इमोजी लॉन्च केल्याने गणेशभक्ता खुश झाले आहेत. सोबतच याचा जास्तीत जास्त फायदाही घेतला जाणार आहे. नेहमी पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून आपला प्रचार करणारी मंडळं आता थेट ट्विटरवरुन लोकांपर्यंत पोहोचू शकतात.
    आजकाल प्रत्येकाकडेच मोबाईल आहे, आणि सोशल मिडियावरील प्रमाणही खूप आहे. त्यामुळे ट्विटरने उचललेलं हे पाऊल गणेशभक्तांसाठी वरदान ठरणार आहे.
  • ==========================================
  • भगवान विष्णूंच्या फोटो प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

    • First Published :05-September-2016 : 16:46:32

    • ऑनलाइन लोकमत 
      नवी दिल्ली, दि. ५ - एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णू रूपातील फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे अडचणीत सापडलेला भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी धोनी विरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले. 
       
      मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचा विष्णूरुपातील फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी तक्रार दाखल केली होती. 
       
      २०१३ मधील संबंधित छायाचित्रात धोनीच्या हातात खाण्याच्या विविध वस्तू आहेत. यामध्ये बुटाचा समावेश होता.  आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्हा येथील एका स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. त्यानंतर धोनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 
       
      आपल्याला त्रास देण्यासाठी खटला दाखल करण्यात आलाय असे त्याने न्यायालायत सांगितले होते.  आपल्या विरोधातील गुन्हेगारी कारवाई रद्द करावी अशी त्याने विनंती केली होती. अखेर न्यायालयाने आज धोनीचा युक्तीवाद मान्य करत त्याला दिलासा दिला. 
    • ====================================
    • आमीर आणि अमिताभ पहिल्यांदा एकत्र काम करणार

      • First Published :05-September-2016 : 10:01:34

      • - ऑनलाइन लोकमत 
        मुंबई, दि. 5 - बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार. दोघांनीही एकाहून एक सुपरहिट आणि सरस चित्रपट दिले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांनी आजपर्यंत कधीही एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. पण लवकरच दोघेही एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आमीर खान लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी ‘ठग’ या सिनेमात झळकणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. 
         
        अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपण आमीरसोबत चित्रपट करत असल्याच्या बातमीला दुजोरा दिलं असल्याचं सांगितल आहे. एका बेबसाईटला आमिताभ बच्चन यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सोबतच काही अटींमुळे आपण या चित्रपटाबद्दल जास्त काही बोलू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र आपण आमीरसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं ते बोलले आहेत. 
         
        चित्रपटाचं नाव जरी 'ठग' सांगण्यात आलं असलं तरी हे नाव अजून नक्की झालेलं नाही. ‘धूम 3’ चा दिग्दर्शक विजय कृष्‍ण आचार्य ‘ठग’चं दिग्दर्शन करणार आहे. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट असेल. 
      • ==================================
      • विश्व हिंदू परिषद सांगते 'गो तस्करांना मारा, पण हाडं तोडू नका'

        • First Published :05-September-2016 : 11:47:44

        • - ऑनलाइन लोकमत
          मेरठ, दि. 5 - गायींची तस्करी करणा-यांना रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने गोरक्षकांना 'गो तस्करांना मारा, पण हाडं तोडू नका' असा संदेश दिला आहे . विश्व हिंदू परिषदेच्या गो रक्षक विभागाने हा संदेश दिला आहे. 
           
          पश्चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमधील वरिष्ठ गो रक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीत गो रक्षक विभागाच्या केंद्रीय समितीचे सदस्य खेमचंद यांनी कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे सदस्य नसतानाही गो रक्षणासाठी काम करणा-यांची यादी तयार करण्यास सांगितलं आहे. 'जेणेकरुन गायांची तस्करी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे आणि जेव्हा तस्करी करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा गो रक्षक सैनिकांचा त्यांना सामना करावा लागेल', असं खेमचंज बोलले आहेत.
           
          खेमचंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी 'मेक इन इंडिया'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशाची सुरक्षा 'मेक इन इंडिया' नाही तर गो रक्षणामुळेच होणार असल्याचा दावा केला. 
        • ===============================

No comments: