[अंतरराष्ट्रीय]
१- लास वेगास; तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न!
२- पाकचे पुन्हा तुणतुणे: 26/11 चे पुरावे द्या
३- भारतीयांचे स्विस बॅंकांतील काळे धन घटले...
४- काबूलमध्ये बसवर हल्ला; 40 जण ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- गे, लेस्बियन यांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा नाही : सुप्रीम कोर्ट
६- युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही : उद्धव ठाकरे
७- 'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो
८- खडसेंनी देश हादरविणारा ‘तो’ गौप्यस्फोट करावाच ! - विखे पाटील
९- राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा
१०- पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही
११- पीडित महिलेसोबत सेल्फी लज्जास्पद- कॉंग्रेस
१२- जाहिरातींचा खर्च मोदींच्या कपड्यांपेक्षा कमी - आप
१३- टपाल खात्याच्या 'पर्सनल' तिकिटांना प्रतिसाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- सालाबादप्रमाणे अकोला महापालिकेत राडा, माईकची तोडफोड आणि शिवीगाळ
१५- मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट
१६- ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात
१७- केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
१८- रायगड; 58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार
१९- पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे
२०- कानपूर; आझम खानने अभियंत्याला कानाखाली मारली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- अमरावती; इच्छेविरोधात मातृत्त्वाचा भार, तान्हुल्यासाठी कुमारी मातेचा संघर्ष
२२- चेंबूर; मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या
२३- लातूर; रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
२४- हिंगोलीत नदीला पूर, शेतात गेलेले शेतातच अडकले; यवतमाळमध्येही जोरदार पाऊस
२५- जळगाव; मुलीच्या लग्नासाठी केली २६ दुचाकींची चोरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर
२७- पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==============================================




ट्रान्सजेंडर व्यक्तींना तिसरं लिंग म्हणून सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये मान्यता दिली होती. ट्रान्सजेंडरची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत केंद्राने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केली. गे, लेस्बियन (समलैंगिक) आणि बायसेक्शुअल (उभयलिंगी) व्यक्तींना तिसऱ्या लिंगात समाविष्ट करणार नसल्याचं कोर्टाने ठणकावून सांगितलं.
LGBT (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) समुदायाला ओबीसी (मागासवर्गीय) मध्ये धरुन ओबीसींनी दिल्या जाणाऱ्या सुविधा या समुदायाला द्याव्यात का, अशी विचारणा केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेत केली होती. कोर्टाचा निर्णय लागू करण्यात अडचणी येत असल्याचं केंद्राने सांगितलं.


काही वर्षांपूर्वी सावित्रीच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, यानंतर सावित्री आपल्या तीन मुलांसह या भागात राहत होती. यातील दोघांचा आजारादरम्यान मृत्यू झाला.
सावित्रीच्या सहा वर्षांच्या मुलाला मिरगीचा त्रास होता. त्याच्या उपचारासाठी गेले काही महिने सावित्रीला मोठ्या प्रमाणात खर्च येत होता.
अत्यंत कमी पगारात काम करणाऱ्या सावित्रीला आपल्या मुलावरच्या उपचारांचा खर्च झेपत नव्हता, म्हणून अखेर परिस्थितीला कंटाळून सावित्रीने ओढणीने गळा दाबून आपल्याच मुलाची हत्या केली.

हे विद्यार्थी टेम्पो आणि जीपमध्ये रोज प्रवास करतात. कारण रस्ता खराब असल्याने जाणवळाला एस टी बस येत नाही. कवठाळी ते जाणवळ ९ किलोमीटर, दवेली ते जाणवळ ६ किलोमीटर आणि आनंदवाडी ते जाणवळ १४ किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे या तीन गावातील विद्यार्थ्याना पाचवी नंतर शिक्षण घ्यावयचे झाल्यास त्यांना जाणवळाला यावे लागते, मात्र एस टी बस येतच नाही रस्त्याचे कारण दिले जाते शेवटी ह्या गावातील विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी एकत्र येत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे ते ही शाळा बंद ठेवून.
जानवळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि सरस्वती विद्यालयच्या शिक्षकांनी महिना पस्तीस हजार रुपये स्वखर्चातून जीप आणि टेम्पोचे भाडे भरत आहेत. शेवटचा उपाय म्हणून ते मुख्यमंत्र्याना पत्र लिहणार आहेत

बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. तीन हात नाका परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या दरोड्यात 5 ते 6 कोटी रुपये लुटले गेल्याची माहिती आहे.


परिवहन आयुक्त तोमिन जे. तचनकारी म्हणाले की, ‘हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. यासंबंधी पेट्रोलियम कंपनी आणि पेट्रोल पंप मालकांना आवश्यक असे आदेश जारी करण्यात आले आहेत.’


मलेशियन एअरलाईन असलेल्या ‘एअर एशिया’ने रजनीचा चेहरा विमानावर झळकवून त्याला मानवंदना दिली आहे. कबाली या वर्षातला सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट मानला जात असून रजनीकांतसोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही यात दिसणार आहे. कबाली चित्रपटाचा टीझर आणि पहिल्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. कोट्यवधी प्रेक्षकांनी हा टीझर पाहिला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप वादात अडकली आहे.
एअर एशिया कबालीची ऑफिशिअल एअरलाईन पार्टनर आहे. चित्रपटात काही सीन्समध्ये हे विमान वापरण्यात आलं आहे. विमानाच्या बाह्य भागावर रजनीच्या डॉन अवतारातले चित्र रंगवून विमान कंपनीने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या विमानाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.
१- लास वेगास; तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न!
२- पाकचे पुन्हा तुणतुणे: 26/11 चे पुरावे द्या
३- भारतीयांचे स्विस बॅंकांतील काळे धन घटले...
४- काबूलमध्ये बसवर हल्ला; 40 जण ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- गे, लेस्बियन यांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा नाही : सुप्रीम कोर्ट
६- युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही : उद्धव ठाकरे
७- 'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो
८- खडसेंनी देश हादरविणारा ‘तो’ गौप्यस्फोट करावाच ! - विखे पाटील
९- राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा
१०- पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही
११- पीडित महिलेसोबत सेल्फी लज्जास्पद- कॉंग्रेस
१२- जाहिरातींचा खर्च मोदींच्या कपड्यांपेक्षा कमी - आप
१३- टपाल खात्याच्या 'पर्सनल' तिकिटांना प्रतिसाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- सालाबादप्रमाणे अकोला महापालिकेत राडा, माईकची तोडफोड आणि शिवीगाळ
१५- मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट
१६- ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात
१७- केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
१८- रायगड; 58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार
१९- पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे
२०- कानपूर; आझम खानने अभियंत्याला कानाखाली मारली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- अमरावती; इच्छेविरोधात मातृत्त्वाचा भार, तान्हुल्यासाठी कुमारी मातेचा संघर्ष
२२- चेंबूर; मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या
२३- लातूर; रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
२४- हिंगोलीत नदीला पूर, शेतात गेलेले शेतातच अडकले; यवतमाळमध्येही जोरदार पाऊस
२५- जळगाव; मुलीच्या लग्नासाठी केली २६ दुचाकींची चोरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर
२७- पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==============================================
इच्छेविरोधात मातृत्त्वाचा भार, तान्हुल्यासाठी कुमारी मातेचा संघर्ष
अमरावती : मातृत्त्व… निसर्गाने स्त्रीला दिलेलं वरदान. मात्र अमरावतीतील एका शाळकरी मुलीसाठी मातृत्त्व वरदान नव्हे तर शाप ठरला आहे. गावातील एका वासनांध सैतानाच्या अत्याचारामुळे 17 वर्षाच्या मुलीला इच्छेविरुद्ध बाळाला जन्म द्यावा लागला.
कुमारी माता हा नुसता शब्दच अस्पृश्य मानला जातो. मात्र हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आदिवासी, मागासलेल्या भागातील जळजळीत वास्तव आहे. मात्र मेळघाटात 17 वर्षांच्या कुमारी मातेला बाळाच्या दुधासाठी 300 रुपयांना स्वत:चा मोबाईल विकावा लागला. इतकंच नाही तर बाळाच्या वडिलांचं नाव म्हणून स्वत:च्या वडिलांचं नाव लिहावं लागलं.
खरंतर या राणीचं (नाव बदललं आहे) शाळेत जाण्याचं वय. घरी अठराविश्व दारिद्र्य. शिकून आपल्या कुटुंबाला गरिबीच्या विळख्यातून सोडवण्याचं स्वप्न राणीने पाहिलं. पण, गेल्या वर्षी उन्हाळाच्या सुट्टीत राणी गावात आली आणि तिचं आयुष्य एका खडतर वळणावर येऊन पोहोचलं.
कारण गावात राहणाऱ्या दिनेश ठाकरेने तिच्यावर अतिप्रसंग केला. दिनेश ठाकरेमुळे राणीला दिवस गेले. राणीचे आई-वडील दाद मागण्यासाठी दिनेशच्या घरी गेले. राणीवर अत्याचार करणारा दिशेन धनाढ्याचा पोर. आई-बापाने पैशांच्या जोरावर मुलाच्या चुकांवर पांघरुन घातलं.
मात्र राणीच्या पदरात एका लेकराची जबाबदारी पडली. डॉक्टरने जेव्हा बाळाच्या पित्याचं नाव विचारलं, तेव्हा राणीने रकान्यात आपल्याच बापाचं नाव लिहिलं. आता या तान्हुल्या जीवाला वाढवण्यासाठी राणीचा संघर्ष सुरु आहे.
मुलाच्या जन्मानंतर पोलिसांनी राणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिनेश ठाकरेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्रकरणाचा तपास डीएनए रिपोर्ट अभावी खोळंबला आहे.
राणीची कैफियत घेऊन एबीपी माझाची टीम पोलीस अधीक्षकांकडे गेली. तूर्तास तरी एसपी लखी गौतम यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीचं आश्वासन दिलं आहे.
आता राणीला एक नव्हे तर तीन लेकरांना संभाळावं लागत आहे. कारण तिच्या भावाच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं भावाच्या दोन लेकरांची जबाबदारीही तिच्याच खांद्यावर आली आहे.
==============================================
सालाबादप्रमाणे अकोला महापालिकेत राडा, माईकची तोडफोड आणि शिवीगाळ
अकोला : रस्ते विकासाच्या निधीवरुन अकोला महापालिकेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. माईकची तोडफोड, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे असा प्रकार महापालिका सभागृहात पाहायला मिळाला. एवढंच नाही तर काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर मदन भरगड यांनी महापालिकेचा चित्रीकरण कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला.
सरकारकडून अकोला महापालिकेला 5.75 कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीचं वाटप करताना सत्ताधारी भाजप-शिवसेनेने विरोधकांना डावलल्याच आरोप करत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भारिपच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. या गोंधळात भारिपचे नगरसेवक रामा तायडे यांच्या बोटाला दुखापत झाली असून 12 टाके पडले आहेत. इतकंच नाही तर विरोधांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना ‘चोर-चोर’ म्हणत सभागृह दणाणून सोडलं आहे.
महापौरांनी मात्र या गोंधळाप्रकरणी विरोधकांना दोषी धरलं आहे. सहा विषयांना गोंधळातच मान्यता देत सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली.
==============================================
युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेना- भाजप युतीतील वाद मिटेल की नाही माहित नाही. ते दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे. ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाही त्यावर आम्ही बोलूच, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. वनमंत्रालयाने 1 जुलैरोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मुनगंटीवारांचं हे निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला.
वाद मिटेल की नाही माहित नाही
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मात्र सध्याचं वातावरण पाहाता, दोन्ही एकमेकांचे प्रचंड विरोधक असल्याचं चित्र आहे.
त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
==============================================
गे, लेस्बियन यांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा नाही : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : तिसरं लिंग अर्थात थर्ड जेंडरमध्ये फक्त ट्रान्सजेंडर व्यक्तींचाच समावेश होईल; गे, लेस्बियन आणि बायसेक्शुअल यांना या गटात समाविष्ट केलं जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने 2014 मधील स्वतःचाच निर्णय बदलण्यास नकार दिला आहे.
ट्रान्सजेंडर व्यक्तींना तिसरं लिंग म्हणून सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये मान्यता दिली होती. ट्रान्सजेंडरची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत केंद्राने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केली. गे, लेस्बियन (समलैंगिक) आणि बायसेक्शुअल (उभयलिंगी) व्यक्तींना तिसऱ्या लिंगात समाविष्ट करणार नसल्याचं कोर्टाने ठणकावून सांगितलं.
LGBT (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) समुदायाला ओबीसी (मागासवर्गीय) मध्ये धरुन ओबीसींनी दिल्या जाणाऱ्या सुविधा या समुदायाला द्याव्यात का, अशी विचारणा केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेत केली होती. कोर्टाचा निर्णय लागू करण्यात अडचणी येत असल्याचं केंद्राने सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना तिसरं लिंग अशी वेगळी ओळख मिळाली होती. यापूर्वी ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्त्री किंवा पुरुष यापैकी एक पर्याय निवडण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
==============================================
मुनगंटीवार 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना 'वाघ' भेट
मुंबई : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाघाचा फायबरचा पुतळा भेट दिला. मुनगंटीवार यांनी ‘मातोश्री’वर जाऊन हा पुतळा भेट दिला.
वनमंत्रालयाने 1 जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत, मात्र सध्याचं वातावरण पाहाता, दोन्ही एकमेकांचे प्रचंड विरोधक असल्याचं चित्र आहे.
त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
त्यामुळे मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळे सेना-भाजपचा तणाव कमी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
==============================================
मुलाच्या उपचाराचा खर्च न परवडल्याने आईकडून लेकाची हत्या
मुंबई : मुलाच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्याने आईने आपल्याच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या चेंबूरमध्ये समोर आला आहे. सावित्री दोरणाली असं या महिलेचं नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
काही वर्षांपूर्वी सावित्रीच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, यानंतर सावित्री आपल्या तीन मुलांसह या भागात राहत होती. यातील दोघांचा आजारादरम्यान मृत्यू झाला.
सावित्रीच्या सहा वर्षांच्या मुलाला मिरगीचा त्रास होता. त्याच्या उपचारासाठी गेले काही महिने सावित्रीला मोठ्या प्रमाणात खर्च येत होता.
अत्यंत कमी पगारात काम करणाऱ्या सावित्रीला आपल्या मुलावरच्या उपचारांचा खर्च झेपत नव्हता, म्हणून अखेर परिस्थितीला कंटाळून सावित्रीने ओढणीने गळा दाबून आपल्याच मुलाची हत्या केली.
==============================================
रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
लातूर : रस्ता खराब असल्याने बस येत नाही. त्यामुळे तीन गावांतल्या विद्यार्थ्यांवर शाळेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहणार आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून भाड्याच्या खासगी वाहनाने विद्यार्थ्याची ने-आण सुरु केली आहे. मात्र या विद्यार्थ्यांनीच त्यावर उपायही शोधून काढला आहे. हे चिमुरडे थेट मुख्यमंत्र्याना पत्र लिहित आहेत.
हे विद्यार्थी टेम्पो आणि जीपमध्ये रोज प्रवास करतात. कारण रस्ता खराब असल्याने जाणवळाला एस टी बस येत नाही. कवठाळी ते जाणवळ ९ किलोमीटर, दवेली ते जाणवळ ६ किलोमीटर आणि आनंदवाडी ते जाणवळ १४ किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे या तीन गावातील विद्यार्थ्याना पाचवी नंतर शिक्षण घ्यावयचे झाल्यास त्यांना जाणवळाला यावे लागते, मात्र एस टी बस येतच नाही रस्त्याचे कारण दिले जाते शेवटी ह्या गावातील विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी एकत्र येत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे ते ही शाळा बंद ठेवून.
जानवळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि सरस्वती विद्यालयच्या शिक्षकांनी महिना पस्तीस हजार रुपये स्वखर्चातून जीप आणि टेम्पोचे भाडे भरत आहेत. शेवटचा उपाय म्हणून ते मुख्यमंत्र्याना पत्र लिहणार आहेत
==============================================
ठाण्यातील चेकमेटवरील दरोड्या प्रकरणी सात संशयित ताब्यात
ठाणे : मंगळवारी ठाण्यात पडलेल्या दरोड्याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी काही जणांना नाशिकमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय.
बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. तीन हात नाका परिसरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली. या दरोड्यात 5 ते 6 कोटी रुपये लुटले गेल्याची माहिती आहे.
==============================================
VIDEO: तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न!
फोटो सौजन्य: यू ट्यूब व्हिडिओ
लास वेगास: अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका व्यक्तीनं चक्क स्मार्टफोनशी लग्न केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती देण्यात आली आहे.
जसा लग्नसोहळा असतो तसाच हा लग्न सोहळा देखील पार पडला. फक्त एकाच गोष्टीमध्ये फरक होता. नवरा मुलगा एरॉन चेर्वेनाकनं लग्नासाठी खास ड्रेस परिधान केला होता. पण त्याची ‘नवरी’ एका डब्यात बंद होती. लास वेगास रिव्ह्यू जनर्लमध्ये ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.
लिटील वेगास चॅपलच्या पादरीनं लग्नाच्या विधी पार पाडताना चेर्वेनाकला विचारलं की, ‘एरॉन तू या स्मार्टफोनला कायद्यानं पत्नी मानतोस? तू तिच्यावर प्रेम करतोस? तिचा सन्मान करतोस?’ त्यावर त्यानं उत्तर दिलं की, ‘होय मी असं करतो.’
द लिटिल लास वेगास चॅपलचा मालक मायकल केलीच्या हवाल्यानं केटीएनव्ही डॉट कॉमचं म्हणणं आहे की, केलीच्या मते, ‘सगळ्यात आधी मला वाटलं की हे काय आहे? त्यानंतर म्हटलं की, ठीक आहे… करतात असं.’
केलीच्या मते, ‘चेर्वेनाकने आपल्या स्मार्टफोनशी प्रातिनिधिक स्वरुपात लग्न करुन समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. लोक आज समाजात आपल्या फोनशी एवढं जोडले गेले आहेत की, त्यांना कायम त्याच्यासोबत राहायचं असतं.’
==============================================
केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
तिरुवनंतपुरम: केरळमध्ये दुचाकी वाहनांचे वाढत्या रस्ते अपघातानं चिंतित असणाऱ्या राज्य सरकारन काल एक वेगळीच घोषणा केली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी केरळ सरकारनं फारच नामी शक्कल लढवली आहे. ज्या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही. अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे.
परिवहन आयुक्त तोमिन जे. तचनकारी म्हणाले की, ‘हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. यासंबंधी पेट्रोलियम कंपनी आणि पेट्रोल पंप मालकांना आवश्यक असे आदेश जारी करण्यात आले आहेत.’
एक ऑगस्टपासून सगळ्यात आधी तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम आणि कोझिकोड येथे प्रायोगिक तत्वावर हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यातही हा नियम लागू केला जाईल.
परिवहन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तेल कंपन्या, डिलर आणि पेट्रोल पंप मालकांशी आमची चर्चा झाली असून विना हेल्मेट असणाऱ्या चालाकांना पेट्रोल न देण्याचे आदेश दिले आहेत.’
एक अधिकृत पत्रकात असं सांगण्यात आलं आहे की, केरळमध्ये रस्ते अपघातात 50 टक्के दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 80 टक्के लोकांना डोक्याला जबर मार लागल्यानं मृत्यू झाला आहे.
==============================================
हिंगोलीत नदीला पूर, शेतात गेलेले शेतातच अडकले
हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे. या पुराचा फटका कुरुंदा, आंबा, सेलू या गावांना बसला. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे.
कुरुंदा गाव जलमय झालंय. नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. यात 10 ते 15 घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पुरामुळे लाखो रूपयांचे नुकसान झालं आहे.
या पुराच्या पाण्यामुळे दिवसा शेतात काम करण्यासाठी गेलेले काही जण शेतातच अडकून पडले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या आखाड्यांवरील जनावरे वाहून गेली आहेत.
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्हालळे परिसरात रात्रीतून 103 मि.मी. पावसाची नोंद झाली.
यवतमाळमध्येही जोरदार पाऊस
यवतमाळमध्ये आज जोरदार पाऊस झाला. यामुळे काही काळ घोटी गावजवळच्या पुलावरुन पाणी वाहतं होतं.. यवतमाळबरोबरच वर्ध्याच्या काही भागातही सरी बरसल्या आहेत. ज्या पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसलाय, त्याठिकाणी खोळंबलेल्या पेरण्याही सुरु झाल्या आहेत. आज या घडीपर्यंत विदर्भ वगळता राज्यात इतरत्र फारसा पाऊस नाही.
==============================================
'एअर एशिया'चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो
कबाली हा चित्रपट 15 किंवा 22 जुलै 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो : गलाटा.कॉम)
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कबाली’ चित्रपटाची चर्चा सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळत आहे. रजनीच्या चाहत्यांनी चॉकलेटचा पुतळा उभारुन त्याला अनोखी भेट दिली असतानाच आता ‘एअर एशिया’च्या विमानावरच थलैवाचा फोटो पाहायला मिळणार आहे.
मलेशियन एअरलाईन असलेल्या ‘एअर एशिया’ने रजनीचा चेहरा विमानावर झळकवून त्याला मानवंदना दिली आहे. कबाली या वर्षातला सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट मानला जात असून रजनीकांतसोबत मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेही यात दिसणार आहे. कबाली चित्रपटाचा टीझर आणि पहिल्या गाण्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. कोट्यवधी प्रेक्षकांनी हा टीझर पाहिला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप वादात अडकली आहे.
एअर एशिया कबालीची ऑफिशिअल एअरलाईन पार्टनर आहे. चित्रपटात काही सीन्समध्ये हे विमान वापरण्यात आलं आहे. विमानाच्या बाह्य भागावर रजनीच्या डॉन अवतारातले चित्र रंगवून विमान कंपनीने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या विमानाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.
==============================================
खडसेंनी देश हादरविणारा ‘तो’ गौप्यस्फोट करावाच !
- ऑनलाइन लोकमतशिर्डी, दि. 30 : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्याकडे असलेली देश हादरविणारी माहिती दडवून ठेवू नये. ही बाब देशहिताची नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंनी ‘तो’ गौप्यस्फोट करावाच, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. खडसे यांनी काल जळगाव येथे केलेल्या विधानासंसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंकडे धक्कादायक व संवेदनशील माहिती असतानाही ते बोलणार नसतील तर त्यांनी का व कोणत्या स्वार्थासाठी मौन बाळगले, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे देश हादरण्याची चिंता सोडून खडसेंनी ती माहिती उघड करण्याची गरज आहे.आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भांत विरोधकांनी पुरावे न दिल्याचा खडसेंचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, राज्यातील भाजप-शिवसेना मंत्र्यांच्या भ्ररष्टाचारा संदर्भात अनेक पुरावे समोर आले. विरोधी पक्ष, प्रसार माध्यमे आणि अनेक संस्था व व्यक्तींनी वेगवेगळे पुरावे दिले.
==============================================
58 व्या वर्षी 7 तास धावून 58 किमी अंतर केले पार
- जयंत धुळप / दि.30 (अलिबाग)रायगड पाेलीस दलातील राष्ट्रपती पाेलीस पदक प्राप्त क्रिडापटू पाेलीस उप निरिक्षक विश्वनाथ पाटील यांनी आपल्या वयाच्या 58 व्या वर्षी गुरुवारी सकाळी 5 वाजता रायगड जिल्हा पाेलीस मुख्यालयाच्या मैदानावरुन धावण्यास प्रारंभ करुन अलिबाग-पाेयनाड-वडखळ-साई मंदिर (पेण) आणि परत असे 58 किमी अंतर तब्बल 7 तासात पार करुन आपल्या सेवानिवृत्ती दिनी आगळा संदेश महाराष्ट्र पाेलिस दलास दिला आहे.या दरम्यान वडखळ येथे जयकिसान विद्यामंदिरचे शिक्षक पी.व्ही,म्हात्रे यांनी विद्याथ्यार्ंसह पाटील यांना शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे यांनी देखील पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान पाटील अलिबाग मध्ये परतल्यावर येथील जे.एस.एम.काॅलेजचे प्राचार्य प्रा.अविनाश आेक यांनी काॅलेज जवळ पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. पाेलीस मुख्यालयात पाेहाेचल्यावर एकच जल्लाेष झाला. पाेलिस उप अधिक्षक राजेंद्र दंडाळे आणि अनेक मान्यवरांनी पाटील यांचे अिभनंदन केले.मला आज काेणताही रेकाॅर्ड नाेंदवायचा नव्हता तर दरराेज व्यायामाकरीता वेळ दिल्यास 58 व्या वर्षी देखील आपण 58 किमी अंतर धावून पार करु शकताे हा संदेश माझ्या पाेलीस दलातील तरुण सहकार्यांना माझ्या कृतीतून द्यायचा हाेता. ताे मी देवू शकलाे याचा माेठा आनंद असल्याचे पाटील यांनी यावेळी बाेलताना सांगून माझ्या उपक्रमास सहकार्य केल्या बद्दल त्यांनी जिल्हा पाेलीस अधिक्षक माे.सुवेझ हक यांना अखेरीस धन्यवाद दिले.
==============================================
रवीशास्त्रींच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते - गौतम गंभीर
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 : कोच पदावरून भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात माजी कर्णधार बिशनसिंग बेदी नंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने उडी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवीशास्त्री यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तो म्हणाला, रवीशास्त्री यांच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते. कुंबळे सर्वोत्कृष्ट पसंती असून ती कठोर मेहनत घेणारी व्यक्ती आहे.माजी खेळाडू आणि सध्या समालोचक असलेला संजय मांजरेकर याने टिट्वटरवर मत मांडताना कुंबळेला पाठिंबा दिला. तो म्हणाला, माझ्यामते रवी कोचपदासाठी निवड न झाल्याने हताश आहे. हा त्याच्यासाठी नवा अनुभव असेल कारण बीसीसीआयने कोचपदी उत्कृष्ट व्यक्तीची निवड केली आहे. गंभीर याने रवी शास्त्रीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत एकप्रकारे गांगुलीला पाठिंबा दर्शवला आहे.
==============================================
राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३० - राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला. सरकार माझ्या विरोधात काहीही सिद्ध करु शकत नाही असा दावा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर विविध जमिन घोटाळयाचे आरोप आहेत. त्याची चौकशी सुरु आहे.पुराव्याशिवाय ते काहीही सिद्ध करु शकत नाहीत. दशकभरापासून माझ्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप होत आहेत असे वड्रा यांनी म्हटले आहे. हरयाणामध्ये झालेल्या जमिन व्यवहारांच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती एस.एन.धिंग्रा आयोगाची स्थापना झाल्यानंतर लगेचच वड्रा यांनी एफबी पोस्टवरुन आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.बांधकाम क्षेत्रातील डीएलएफ आणि वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटलिटीमध्ये झालेल्या जमिन व्यवहारांचीही चौकशी होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला हे मला ठाऊक आहे. पण माझी बाजू सत्याची आहे.त्यामुळे मी ताठ मानेनेच चालणार. माझ्या बद्दल जे चुकीचे समज करुन देण्यात आले आहे ते दूर होतील अशा विश्वास वड्रा यांनी त्यांच्या फेसबुकमध्ये पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती धिंग्रा आयोगाने आतापर्यंत २५० फाईल्सची पडताळणी केली आहे.
==============================================
मुलीच्या लग्नासाठी केली २६ दुचाकींची चोरी
- जळगाव : पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज तडवी (रा.कुसुंबा ता.रावेर) याला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरताना रंगेहाथ पकडले. बिंग फुटल्याची जाणीव होताच त्याने आपण निलंबित पोलीस आहोत, अशी बतावणी केली. दरम्यान, त्याने जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालयात, जिल्हा रुग्णालय व न्यायालय आवारातून आतापर्यंत तब्बल २६ दुचाकी चोरल्या आहेत. मुलीच्या लग्नासाठी चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.बाविस्कर व गिरनारे यांनी तडवी याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने मी निलंबित पोलीस कर्मचारी आहे, असे सांगून त्याचे ओळखपत्र दाखविले. जिल्हाधिकारी कार्यालयात काम असल्याने येथे आलो होतो, असे सांगितले. त्यावर आम्हीही तेथेच नोकरीला आहोत, कोणाशी व काय काम आहे असे विचारल्यावर त्याची भंबेरी उडाली.
==============================================
पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे
- ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. ३० - भाजपा सरकारने राज्यातील वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना खासदार, आमदार ही पदे देऊन गप्प करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अशा पदाच्या खैराती केल्याने मराठा समाज गप्प बसेल या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते आ. नितेश राणे यांनी दिला. मराठा-मुस्लिम आरक्षण यल्गार मेळाव्यासाठी नितेश राणे मंगळवारी करमाळ्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.हे सरकार जनसंघाच्या इशार्यावर चालत असल्याचे सांगून निलेश राणे म्हणाले, मराठा-मुस्लिमांना कदापि आरक्षण देणार नाही, त्याच्या रक्तातच ते नाही. काँग्रेसच्या सरकारने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा-मुस्लिम समाजास आरक्षण देऊ केले होते, पण विद्यमान सरकारने ते नाकारले. आपण राज्यभर मराठा-मुस्लिम समाजास आरक्षण मागणीसाठी मेळावे घेत असून करमाळ्यातील हा ११ वा मेळावा झाला आहे. एक दिवस असा उगवेल की आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र पेटून उठेल व सरकारला आरक्षण द्यावे लागेल.आ. राणे म्हणाले, विधिमंडळात २८८ आमदारांपैकी मराठा समाजाचे १४५ आमदार आहेत. ओबीसी ४४, इतर जाती-जमातीचे ३0, परप्रांतीय इतर मागास ३0, परप्रांतीय १९, मुस्लिम १0 व ब्राह्मण १0 याप्रमाणे जातनिहाय बलाबल असताना राज्य मंत्रिमंडळात पाच महत्त्वाच्या खात्यांवर ब्राह्मण बसले आहेत. बाकीच्या लोकांकडे लायकी नाही का? असा सवाल करून राज्यातील लोकसंख्येच्या ३२ टक्के मराठा समाज असताना व या समाजाच्या मताच्या जीवावर निवडणुका जिंकून सत्ता भोगत असतानाही आरक्षण देत नाही, हा समस्त मराठा जातीचा अपमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
==============================================
... आणि सा-यांचा जीव भांड्यात पडला !
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.३० - शालेय सत्राच्या तिस-याच दिवशी चिमुकलीचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस चिमुकलीची शोधाशोध करू लागले. दोन तासातच ती आढळली अन् तिला पाहून पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.वेदिका नरेंद्र गौर (वय ९ वर्षे) हिच्या कथित अपहरणाचा हा किस्सा आहे. धरमपेठच्या आदर्श शाळेत चवथीत शिकणारी वेदिका बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे काछीपु-यातून पायीच शाळेला गेली. सकाळी ११ वाजता शाळा सुटली. मात्र, १२ वाजले तरी ती घरी पोहचली नाही. त्यामुळे पालकांनी तिच्या शाळेत जाऊन पाहिले. ती दिसली नाही. पुन्हा घरी आले. ती घरी पोहचलीच नव्हती. वेदिकाच्या वर्गमैत्रीणींकडे विचारणा केली असता ह्यती शाळेत आली होती. सुटी झाल्यानंतर घराकडे निघाली. कुठे गेली ते माहित नाहीह्ण, असे तिच्या मैत्रीणींनी सांगितले. परिणामी वेदिकांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला . तिला पळवून नेले असावे, अशी शंका घेत त्यांनी दुपारी २.३० वाजता सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. वेदिकाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून तिच्या अपहरणाचा संशय तक्रारीत व्यक्त केला.
==============================================
पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट
- ऑनलाइन लोकमतशहानूर संकुलअकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नरनाळा किल्याचे पायथ्याशी शहानूर निसर्ग पर्यटन केंद्र आहे. अकोट पासुन १७ किलोमीटर अंतरावर हा पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिध्द आहे.शहानूर येथे जाण्याकरिता आकोट येथून एस.टी.महामंडळाची सकाळी ७.३० ला तर परत येण्याकरीता सांयकाळी ५.३० ची बस आहे. तसेच खासगी वाहने जाता येते.आकोट येथुन पोपटखेड धरण पाहल्यानंतर शहानूर या रस्त्यामध्ये छोटे-छोटे नदीनाले लागतात. नरनाळा अभयारण्याचा परिसर असल्याने येथील आठवणींना क्लिक करण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा किंवा स्मार्ट फोन सोबत असावा. शहानूर निसर्ग संकुल येथे वनविभागाने खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली आहे. पंरतु बुंकीग सुरू असली तर मिळेल. त्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य सोबत असणे आवश्यक आहे. शिवाय जंगल फिरण्याकरीता वनविभागाची सफारी उपलब्ध असल्यास मिळु शकते. गाईड सुध्दा मिळतात. लहान मुलांना खेळण्याकरीता साहीत्य आहे. तसेच वन्यप्राणी,वनविभागाची माहीतीसह आदीवाशी बांधवाच्या संस्कृतीचा ठेवा या संकुलात पाहावयास मिळतो.शहानूर पासुन उंचावर नरनाळा किल्ला आहे. या किल्लावर जाण्याकरीता वनविभागाचे अटी व शर्ती लागु करण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनाने गेल्यास एकाच दिवशी शहानूर पर्यटन केंद्र व सुरई धबधबाचा आनंद लुटता येतो.
==============================================
पीएफसाठी खासगी बँकांची सेवा नाही
- नवी दिल्ली : नियोक्त्यांकडून भविष्यनिर्वाह निधी अंशदान जमा करण्यासाठी आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस किंवा एचडीएफसी बँक यासारख्या खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे.ईपीएफओचे विश्वस्त आणि भारतीय मजदूर संघाचे (महाराष्ट्र) सरचिटणीस पी.जे. बाणासुरे यांनी सांगितले की, वित्त, आॅडिट आणि गुंतवणूक समितीने (एफएआयसी) आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक तसेच एचडीएफसी या खासगी बँकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ईपीएफओद्वारे या क्षणी स्टेट बँक ‘भविष्य निधी’ जमा करते.
==============================================
इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये नोव्हेंबर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील न्यायालयीन खटला लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी भारताने अधिक पुरावे द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झकि-उर-रेहमान लख्वी आणि इतर सहा दहशतवादी आरोपी आहेत.
"आमच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय परराष्ट्र सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून अधिक पुराव्यांची मागणी केली आहे. यावर भारताकडून अद्यापी उत्तर यावयाचे आहे,‘‘ असे पाक परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले. अर्थात, हे पत्र केव्हा पाठविण्यात आले, यासंदर्भातील माहिती झकारिया यांनी उघड केली नाही.
पाकचे पुन्हा तुणतुणे: 26/11 चे पुरावे द्या
| |
-
| |
"आमच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय परराष्ट्र सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून अधिक पुराव्यांची मागणी केली आहे. यावर भारताकडून अद्यापी उत्तर यावयाचे आहे,‘‘ असे पाक परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले. अर्थात, हे पत्र केव्हा पाठविण्यात आले, यासंदर्भातील माहिती झकारिया यांनी उघड केली नाही.
==============================================
कानपूर - उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी आपल्याला कानाखाली थप्पड मारल्याचा आरोप एका प्रकल्प अभियंत्याने केला आहे.
रामपूर जिल्ह्यातील एका उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी 25 जून रोजी समाजवादी पक्षाचे नेते तथा मंत्री आझम खान आले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे आर. के. अग्रवाल नावाच्या अभियंत्याने सांगितले. खान यांनी आपली शर्टची कॉलर पकडली, आपल्याविरूद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आणि आपल्या कानाखाली थप्पड मारली असा आरोप अग्रवालने केला आहे. दरम्यान या प्रकारावर नाराज झालेल्या अभियंत्यांच्या संघटनेने काम थांबविले आहे. तसेच खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच जर त्यांनी माफी मागितली नाही तर संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे. खान यांनी यापूर्वी 2012 मध्ये एका भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केले होते.
आझम खानने अभियंत्याला कानाखाली मारली
| |
-
| |
रामपूर जिल्ह्यातील एका उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी 25 जून रोजी समाजवादी पक्षाचे नेते तथा मंत्री आझम खान आले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे आर. के. अग्रवाल नावाच्या अभियंत्याने सांगितले. खान यांनी आपली शर्टची कॉलर पकडली, आपल्याविरूद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली आणि आपल्या कानाखाली थप्पड मारली असा आरोप अग्रवालने केला आहे. दरम्यान या प्रकारावर नाराज झालेल्या अभियंत्यांच्या संघटनेने काम थांबविले आहे. तसेच खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच जर त्यांनी माफी मागितली नाही तर संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे. खान यांनी यापूर्वी 2012 मध्ये एका भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केले होते.
==============================================
झुरिक - स्विस बॅंकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या काळ्या संपत्तीविरोधात भारतासहित एकंदरच जागतिक स्तरावर चालविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी स्विस बॅंकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल एक तृतीयांशाची विक्रमी घट झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारतीयांनी स्विस बॅंकांत ठेवलेली संपत्ती आता एकूण 1.2 अब्ज फ्रॅंक (8,392 हजार कोटी रुपये) इतकी असल्याचे आढळून आले आहे. स्विस राष्ट्रीय बॅंकेने यासंदर्भातील माहिती प्रकाशित केली असून 2015 च्या अखेरीस भारतीयांनी स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल 59.643 कोटी स्विस फ्रॅंक्सची घट झाली आहे. ही माहिती प्रकाशित होण्यास सुरुवात झाल्यापासून भारतीयांनी स्विस बॅंकांमध्ये ठेवलेली ही नीचांकी संपत्ती आहे. याचबरोबर, सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांच्या स्विस बॅंकांमधील धनामध्ये घट होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारतीयांचे स्विस बॅंकांतील काळे धन घटले...
| |
-
| |
भारतीयांनी स्विस बॅंकांत ठेवलेली संपत्ती आता एकूण 1.2 अब्ज फ्रॅंक (8,392 हजार कोटी रुपये) इतकी असल्याचे आढळून आले आहे. स्विस राष्ट्रीय बॅंकेने यासंदर्भातील माहिती प्रकाशित केली असून 2015 च्या अखेरीस भारतीयांनी स्वित्झर्लंडमधील बॅंकांमध्ये ठेवलेल्या संपत्तीमध्ये तब्बल 59.643 कोटी स्विस फ्रॅंक्सची घट झाली आहे. ही माहिती प्रकाशित होण्यास सुरुवात झाल्यापासून भारतीयांनी स्विस बॅंकांमध्ये ठेवलेली ही नीचांकी संपत्ती आहे. याचबरोबर, सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांच्या स्विस बॅंकांमधील धनामध्ये घट होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
==============================================
नवी दिल्ली - राजस्थान महिला आयोगाच्या सदस्यांनी बलात्कारातील पीडित महिलेसोबत काढलेल्या सेल्फी म्हणजे लज्जास्पद आणि कीव येण्यासारखी गोष्ट असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, "ज्या महिलेवर तिच्या पतीने त्याच्या मित्रासोबत बलात्कार केला अशा बलात्कारपीडित महिलेसोबत राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी सेल्फी घेणे अत्यंत लज्जास्पद आहे. कायद्यानुसार बलात्कारपीडित महिलेची ओळख सार्वजनिक करण्यावर बंदी आहे आणि येथे अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी कायदाभंग करणे लज्जास्पद आहे.‘ तसेच जर या लोकांना महिलांसाठीचे कायदे माहित नसतील तर ते महिला आयोगासाठी पात्र नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
उत्तर जयपूरमधील महिला पोलिस ठाण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा या आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांच्यासह बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गुर्जर यांनी त्या पीडितेसोबत सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये अध्यक्षा शर्माही दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी हा सेल्फी व्हॉटसऍपवरून शेअर केला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
पीडित महिलेसोबत सेल्फी लज्जास्पद- कॉंग्रेस
| |
-
| |
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, "ज्या महिलेवर तिच्या पतीने त्याच्या मित्रासोबत बलात्कार केला अशा बलात्कारपीडित महिलेसोबत राजस्थान महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी सेल्फी घेणे अत्यंत लज्जास्पद आहे. कायद्यानुसार बलात्कारपीडित महिलेची ओळख सार्वजनिक करण्यावर बंदी आहे आणि येथे अध्यक्षांनी आणि इतर सदस्यांनी कायदाभंग करणे लज्जास्पद आहे.‘ तसेच जर या लोकांना महिलांसाठीचे कायदे माहित नसतील तर ते महिला आयोगासाठी पात्र नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
उत्तर जयपूरमधील महिला पोलिस ठाण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा या आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांच्यासह बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गुर्जर यांनी त्या पीडितेसोबत सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये अध्यक्षा शर्माही दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी हा सेल्फी व्हॉटसऍपवरून शेअर केला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
==============================================
आप:जाहिरातींचा खर्च मोदींच्या कपड्यांपेक्षा कमी
| |
-
| |
केजरीवाल: रोज दहा लाख रुपयांची उधळण
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची एकही संधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडत नाही. गोव्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मोदींवर त्यांच्या कपड्यांवरून निशाणा साधला. आम आदमी पक्षाच्या (आप) जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या कपड्यांवर झाला, अशी टीका त्यांनी केली. मोदी यांच्या एका दिवसातील कपड्यांवरील खर्च 10 लाख रुपये होतो, असे ते म्हणाले.
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची एकही संधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडत नाही. गोव्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मोदींवर त्यांच्या कपड्यांवरून निशाणा साधला. आम आदमी पक्षाच्या (आप) जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या कपड्यांवर झाला, अशी टीका त्यांनी केली. मोदी यांच्या एका दिवसातील कपड्यांवरील खर्च 10 लाख रुपये होतो, असे ते म्हणाले.
पणजी येथे प्रसारमाध्यमांच्या संपादकांच्या बैठकीत केजरीवाल बोलत होते. ""आम्ही जाहिरातींवर 526 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते, पण ते चुकीचे आहे. "आप‘ने केवळ 76 कोटींच्या जाहिराती केल्या आहेत. दिल्लीतील आमच्या सरकारच्या सर्व विभागांचा जाहिरातींचा खर्च हा मोदी यांच्या कपड्यांवरील खर्चापेक्षा कितीतरी कमी आहे.‘‘ पंतप्रधान मोदी दिवसाला दहा लाख रुपये कपड्यांवर खर्च करतात, असा दावा त्यांनी करीत मोदी यांच्या वेशभूषेवरील खर्चाचा सर्व तपशील देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. ""मोदी परिधान करीत असलेला एक ड्रेस दोन लाख रुपयांचा असतो. मोदी दिवसातून पाच वेळा कपडे बदलतात. त्यानुसार एका दिवसातील त्यांचा कपड्यांवरील खर्च 10 लाख रुपये होतो. एकदा वापरलेले कपडे ते पुन्हा वापरत नाहीत. कपडे धुतले जात नाहीत व दुसऱ्यांदा वापरलेही जात नाहीत,‘‘ असे सांगून मोदी यांच्या कपडेपटाचा आढावाच केजरीवाल यांनी घेतला.
==============================================
नवी दिल्ली - स्वत:चे छायाचित्र असलेल्या टपालाच्या तिकिटांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून 2010 साली सुरू झालेल्या सुविधेतून आतापर्यंत 60 कोटी तर सन 2015-16 या आर्थिक वर्षांत टपाल खात्याला 1 कोटी 38 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
टपालाच्या तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद अनेकांकडून जोपासला जातो. यामध्ये काही विक्रमही नोंदविण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर टपालाच्या तिकिटांच्या माध्यमातून टपाल खात्याची लोकप्रियता वाढविण्यासाठी दरवर्षी नवनवीन कल्पक आणि अनोख्या योजना राबविण्यात येतात. तसेच नवनव्या सुविधाही देण्यात येतात. अशीच एक अनोखी योजना टपाल खात्यामार्फत सुरू आहे. टपाल तिकिट खरेदी करणाऱ्यांना त्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे, कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र, आप्तेष्टांचे, मित्रमंडळींचे किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे छायाचित्र असलेले तिकिट तयार करण्याची सुविधा अलिकडेच सुरू करण्यात आली होती. टपाल खात्याच्या या अनोख्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या ही सुविधा देशातील काही टपाल कार्यालयात आणि ऑनलाईन सुरू आहे.
टपाल खात्याच्या 'पर्सनल' तिकिटांना प्रतिसाद
| |
-
| |
टपालाच्या तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद अनेकांकडून जोपासला जातो. यामध्ये काही विक्रमही नोंदविण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर टपालाच्या तिकिटांच्या माध्यमातून टपाल खात्याची लोकप्रियता वाढविण्यासाठी दरवर्षी नवनवीन कल्पक आणि अनोख्या योजना राबविण्यात येतात. तसेच नवनव्या सुविधाही देण्यात येतात. अशीच एक अनोखी योजना टपाल खात्यामार्फत सुरू आहे. टपाल तिकिट खरेदी करणाऱ्यांना त्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे, कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र, आप्तेष्टांचे, मित्रमंडळींचे किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे छायाचित्र असलेले तिकिट तयार करण्याची सुविधा अलिकडेच सुरू करण्यात आली होती. टपाल खात्याच्या या अनोख्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या ही सुविधा देशातील काही टपाल कार्यालयात आणि ऑनलाईन सुरू आहे.
==============================================
काबूलमध्ये बसवर हल्ला; 40 जण ठार
| |
-
| |
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (गुरुवार) लष्करात नव्याने भरती झालेल्या जवानांना घेऊन जात असलेल्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जण ठार झाले आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूल शहराजवळ हा हल्ला झाला असून, बसमध्ये नव्याने लष्करात भरती झालेले तरुण होते. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्करी शिक्षणाचा पदवीप्रदान सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर हे जवान परतत असताना हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 40 जण ठार झाले असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. लष्कराच्या अन्य एका वाहनावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
काबूलमध्ये गेल्या आठवड्यातच कॅनडाच्या दुतावासाजवळ नेपाळी सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता.
==============================================
