Sunday, 21 August 2016

नमस्कार लाईव्ह २१-०८-२०१६चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- तुर्कीतील लग्नात आत्मघाती स्फोट, 30 जणांचा मृत्यू 
२- मला कुत्रा म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नका; बलोची तरुणाचे उद्गार
३- टर्कीत विवाह सोहळ्यात आत्मघाती हल्ला, ३० ठार
४- पॅरिसवरील इसिसचे हल्ले मुंबईसारखे
५- अमेरिकेतील पार्कमध्ये 'न्यूड' डोनाल्ड ट्रम्प पाहण्यासाठी गर्दी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
६- देशातील शाळा-महाविद्यालयांत 10 लाख शिक्षकांची पदं रिक्त 
७- हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं आवाहन 
८- उर्जित पटेल नवे RBI गव्हर्नर, 3 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार 
९- स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंशनमध्ये 5000 रुपयांनी वाढ 
१०- अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीचा मुहूर्त ठरला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
११- चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून 38 विशेष गाड्यांची भेट 
१२- पोलीस शिपाई मारहाण: भाजप आमदार रामचंद्र अवसरे पोलिसांना शरण 
१३- निलेश राणेंच्या मारहाणीनंतर संदीप सावंतांचा शिवसेनेत प्रवेश 
१४- सणासुदीला महागाईची फोडणी
१५- वाहनचालकांच्या माथी आणखी एक टोल
१६- ...तरच मुंबई ‘स्मार्ट’ होईल!
१७- अल्पवयीन मुलाला कार चालवू देणे पडले महाग
१८- व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार जेरबंद
१९- आज शहनाईचा बादशाह भारतरत्न बिस्मिल्ला खाँ यांची पुण्यतिथी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
२०- वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यामुळे दोघांचा मृत्यू, एक जखमी 
२१- कोल्हापूर; विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध, भावाकडून तरुणाची हत्या 
२२- अहमदनगरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप, एकाला अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२३- योगेश्वर दत्तच्या गावी होमहवन, फोनवरुन आईचा आशिर्वाद 
२४- ऑलिम्पिकमध्ये भारतीय गोल्फपटू अदिती अशोक 41 व्या स्थानावर 
२५- नेमारची विजयी किक, ब्राझिलला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं सुवर्ण 
२६- 'त्या' निर्णायामुळे नरसिंग यादव बसल्या जागी बेशुद्ध! 
२७- आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके
२८- रिओस्टार्स सिंधू, साक्षी आणि दीपावर बक्षिसांचा वर्षाव
२९- फुटबॉलमध्ये ब्राझीलने पटकावले सुवर्णपदक
३०- योगेश्वरकडून देशवासीयांना सुवर्णनिरोपाची अपेक्षा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=======================================

वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यामुळे दोघांचा मृत्यू, एक जखमी

वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यामुळे दोघांचा मृत्यू, एक जखमी
पालघर : खराब रस्त्यांमुळे वाडा-भिवंडी रस्त्यावर आठवडाभरात तीन जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी रात्री वाडा-भिवंडी रोडवर खड्ड्यांमुळे दोघा तरुणांना जीव गमवावा लागला आहे, तर एक जण जखमी आहे.

शनिवारी रात्री आंभईजवळ खड्डयात अडकलेली बाईक काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना मागून येणाऱ्या टेम्पोनं धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांच्या नातेवाईकांनी वाडा-मनोर रस्त्यावर रास्तारोको केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

हा रस्ता बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला बांधण्यासाठी दिला. या रस्त्यावर सुप्रीम कंपनी टोलवसुली करते, मात्र निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण कामामुळे तीन वर्षात 138 जणांचे बळी गेले आहेत, तर दीड हजाराहून अधिक वाहनस्वार जखमी झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

=======================================

देशातील शाळा-महाविद्यालयांत 10 लाख शिक्षकांची पदं रिक्त

देशातील शाळा-महाविद्यालयांत 10 लाख शिक्षकांची पदं रिक्त
नवी दिल्लीः देशातील शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जवळपास 8 ते 10 लाख शिक्षकांची पद रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडेय यांनी स्वतः दिली आहे. सरकार शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी योजना आखत असल्याचंही पांडेय यांनी सांगितलं.

देशात 1976 नंतर शिक्षण धोरणात कसलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकार यासाठी खास धोरण तयार करत असल्याची माहिती पांडेय यांनी दिली. शिक्षकांची लवकरच पूर्तता केली जाईल, अशी ग्वाहीही पांडेय यांनी दिली.

=======================================

योगेश्वर दत्तच्या गावी होमहवन, फोनवरुन आईचा आशिर्वाद

योगेश्वर दत्तच्या गावी होमहवन, फोनवरुन आईचा आशिर्वाद
सोनिपत (हरियाणा): भारताचा पैलवान योगेश्वर दत्तची आज रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिली लढत आहे. या लढतीत आपण जिंकू, तसंच सुवर्णपदक घेऊनच भारतात येऊ, असा विश्वास योगेश्वर दत्तने आईला फोनवरुन दिला आहे. योगेश्वर दत्तला विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या गावात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

योगेश्वर दत्तची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्याने संपूर्ण जिवन कुस्तीला समर्पित केलं आहे. त्यामुळे शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच त्याचं सर्वात मोठं स्वप्न आहे, असं योगेश्वर दत्तच्या आईने सांगितलं. योगेश्वर दत्तने फोनवरुन आईचा आशिर्वाद घेतला आणि पदक जिंकण्याचा निर्धारही केला आहे.

योगेश्वर नक्कीच पदक जिंकेल, असा विश्वास आईनेही व्यक्त केला आहे. योगेश्वर पदकाची कमाई करुन आल्यानंतर तो विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्यासाठी मुलगी पाहून ठेवली असल्याची माहितीही योगेश्वरच्या आईने दिली. रिओ ऑलिम्पिकमध्ये आज सायंकाळी 5 वाजता योगेश्वर दत्तचा सामना होणार आहे.

=======================================
योगेश्वर दत्तच्या गावी होमहवन, फोनवरुन आईचा आशिर्वाद
सोनिपत (हरियाणा): भारताचा पैलवान योगेश्वर दत्तची आज रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिली लढत आहे. या लढतीत आपण जिंकू, तसंच सुवर्णपदक घेऊनच भारतात येऊ, असा विश्वास योगेश्वर दत्तने आईला फोनवरुन दिला आहे. योगेश्वर दत्तला विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या गावात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

योगेश्वर दत्तची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्याने संपूर्ण जिवन कुस्तीला समर्पित केलं आहे. त्यामुळे शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच त्याचं सर्वात मोठं स्वप्न आहे, असं योगेश्वर दत्तच्या आईने सांगितलं. योगेश्वर दत्तने फोनवरुन आईचा आशिर्वाद घेतला आणि पदक जिंकण्याचा निर्धारही केला आहे.

योगेश्वर नक्कीच पदक जिंकेल, असा विश्वास आईनेही व्यक्त केला आहे. योगेश्वर पदकाची कमाई करुन आल्यानंतर तो विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्यासाठी मुलगी पाहून ठेवली असल्याची माहितीही योगेश्वरच्या आईने दिली. रिओ ऑलिम्पिकमध्ये आज सायंकाळी 5 वाजता योगेश्वर दत्तचा सामना होणार आहे.
=======================================

विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध, भावाकडून तरुणाची हत्या

विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध, भावाकडून तरुणाची हत्या
कोल्हापूर : अनैतिक संबंधातून कोल्हापुरात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीशी असलेले अनैतिक संबंध वारंवार सांगूनही तोडत नसल्याने महिलेच्या भावासह त्याच्या मित्राने 30 वर्षीय भरत कांबळे या तरुणाची हत्या केली.

महिलेचा भाऊ मनोज कांबळे आणि त्याचा मित्र विनायक माने यांनी भरत कांबळेची चाकून भोसकून दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. मृत भरत आणि महिला हे पळून जाऊन लग्न करणार होते. त्याच दिवशी आरोपींनी भरतला रेल्वे स्टेशनवर गाठलं.


हातकणंगले तालुक्यातील माले या गावात राहणारा भरत दगडू कांबळे याचे एका विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. हे त्या महिलेच्या नातेवाइकांना समजल्यावर महिलेचा पती आणि इतरांनी भरत कांबळे याची समजूत काढली होती. त्याला समजही दिली होती, मात्र भरतने चार-सहा महिने झाल्यानंतर पुन्हा त्या महिलेशी संबंध निर्माण केले.

=======================================

पैलवान योगेश्वर दत्तचा सुवर्णपदकाचा निर्धार

पैलवान योगेश्वर दत्तचा सुवर्णपदकाचा निर्धार!
मुंबईः भारताचा अनुभवी पैलवान योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकमध्ये यंदा चौथ्यांदा सहभाही होतोय आणि या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार त्याने केला आहे.

लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तकडून भारताला रिओमध्येही पदकाची आशा आहे. ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी योगेश्वर 65 किलो वजनी गटाच्या लढतीत खेळायला उतरणार आहे. त्याला सलामीला मंगलोयाच्या गांझोरिगचा सामना करायचा आहे.

=======================================

विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध, भावाकडून तरुणाची हत्या

विवाहित बहिणीशी अनैतिक संबंध, भावाकडून तरुणाची हत्या
कोल्हापूर : अनैतिक संबंधातून कोल्हापुरात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीशी असलेले अनैतिक संबंध वारंवार सांगूनही तोडत नसल्याने महिलेच्या भावासह त्याच्या मित्राने 30 वर्षीय भरत कांबळे या तरुणाची हत्या केली.

महिलेचा भाऊ मनोज कांबळे आणि त्याचा मित्र विनायक माने यांनी भरत कांबळेची चाकून भोसकून दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. मृत भरत आणि महिला हे पळून जाऊन लग्न करणार होते. त्याच दिवशी आरोपींनी भरतला रेल्वे स्टेशनवर गाठलं.


हातकणंगले तालुक्यातील माले या गावात राहणारा भरत दगडू कांबळे याचे एका विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. हे त्या महिलेच्या नातेवाइकांना समजल्यावर महिलेचा पती आणि इतरांनी भरत कांबळे याची समजूत काढली होती. त्याला समजही दिली होती, मात्र भरतने चार-सहा महिने झाल्यानंतर पुन्हा त्या महिलेशी संबंध निर्माण केले.

=======================================

चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून 38 विशेष गाड्यांची भेट

चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून 38 विशेष गाड्यांची भेट
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 38 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने शनिवारी या गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना आरक्षित तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.
गणेशात्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी 142 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र त्यानंतरही अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी जादा फेऱ्यांची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने 38 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या 180 वर पोहोचली आहे.
=======================================

ऑलिम्पिकमध्ये भारतीय गोल्फपटू अदिती अशोक 41 व्या स्थानावर

ऑलिम्पिकमध्ये भारतीय गोल्फपटू अदिती अशोक 41 व्या स्थानावर
रिओ दि जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फपटू अदिती अशोकला 41व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिकमध्ये 112 वर्षांनी पुनरागमन केलेल्या गोल्फमध्ये 18 वर्षीय अदितीने भारताचं प्रतिनिधित्व केलं.

साक्षी-सिंधू पाठोपाठ अदितीही पदक पटकावून भारताची मान उंचावेल, अशी अपेक्षा भारतीयांकडून व्यक्त केली जात होती. अदिती अशोकने अंतिम फेरीत प्रवेश करुन पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अदितीला अंतिम फेरीत आपला फॉर्म कायम राखता आला नाही.

अदितीने तिसऱ्या फेरीत 79 गुण मिळवल्यामुळे तिची 31 व्या स्थानावर घसरण झाली होती. त्यामुळे भारताच्या गोल्फमधल्या पदकाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या.

=======================================

अहमदनगरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप, एकाला अटक

अहमदनगरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप, एकाला अटक
अहमदनगरः नोकरीचं आमीष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी विलास वरपे या तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर दोघे जण फरार आहेत.


बँकेत नोकरीचं आमिष दाखवून विलासने जुलै ते ऑगस्ट महिन्यात नगर, राहुरी आणि पुणे जिल्ह्यात तरुणीला लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्याचबरोबर शनिवारी राहुरी तालुक्यात डोंगरावर झाडीत नेऊन विलास वरपेसह इतर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची पीडितेने तक्रार नोंदवली आहे.


आरोपींनी तरुणीचा मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उर्वरित दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

=======================================

तुर्कीतील लग्नात आत्मघाती स्फोट, 30 जणांचा मृत्यू

तुर्कीतील लग्नात आत्मघाती स्फोट, 30 जणांचा मृत्यू
फोटो सौजन्य : रॉयटर्स
अंकारा : तुर्कस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये 30 जणांना जीव गमवावा लागला आहे. सिरियाच्या सीमेजवळ असणाऱ्या गजनीटेप शहरात एका लग्नसमारंभात हा स्फोट झाला.

या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला असून 94 जण जखमी आहेत. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास हा स्फोट झाला असून यामागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आयसीसने हा आत्मघाती हल्ला घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी सुरक्षा दलाला टार्गेट करत तुर्कस्तानच्या काही भागात स्फोट घडवण्यात आले होते. त्या स्फोटांमध्येही 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल 220 जण जखमी झाले होते. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या या हल्ल्यात पोलीस आणि सैन्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं.
=======================================

हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं आवाहन

हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं आवाहन
आग्रा : हिंदू नागरिकांनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जर इतर धर्मीय इतक्या मुलांना जन्म देऊ शकतात, तर तुम्हाला कोणी अडवलंय? असा सवाल भागवतांनी यावेळी उपस्थित केला. हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे भागवतांनी हा सल्ला दिला आहे. आग्र्यातील एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी हे आवाहन केलं आहे.

हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे असं आवाहन यापूर्वी प्रविण तोगडिया, साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनी केलं होतं. त्यावरुन मोठा गदारोळही माजला होता. मात्र आता साक्षात सरसंघचालकांच्या अशा वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

=======================================

उर्जित पटेल नवे RBI गव्हर्नर, 3 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार

उर्जित पटेल नवे RBI गव्हर्नर, 3 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार
Powered By Triangulumनवी दिल्ली रघुराम राजन यांना दुसरी संधी न देता प्रचंड वाद ओढवून घेतलेल्या मोदी सरकारनं रिझर्व्ह बँकेची धुरा डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर दिली आहे. 3 सप्टेबरला रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर पटेल रिझर्व बँकेचा पदभार स्वीकारतील. उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर असणार आहेत.

52 वर्षांचे उर्जित पटेल गेली 3 वर्ष रघुराम राजन यांच्यासोबत काम करत आहेत. राजन यांच्याप्रमाणेच पटेलसुद्धा येल आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिकून आले आहेत. जागतिक अर्थकारण आणि रणनीती यामध्ये पारंगत मानले जातात.

रघुराम राजन आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. त्यामुळं ती धग अनुभवलेल्या उर्जित पटेल यांना नेमकं सरकारला काय हवंय? याचा अंदाज आहे. त्यामुळं भविष्यात आर्थिक धोरणं राबवताना सरकारची अडचण थोडी कमी होईल.
=======================================

नेमारची विजयी किक, ब्राझिलला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं सुवर्ण

नेमारची विजयी किक, ब्राझिलला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं सुवर्ण
रिओ द जनैरोः फुटबॉल स्टार नेमारच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर ब्राझीलने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. ब्राझिलने अंतिम सामन्यात जर्मनीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये 5-4 असा विजय मिळवला.

हा सामना निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. मग पेनल्टी शूट आऊटमध्ये अखेरच्या किकवर नेमारने गोल झळकावून ब्राझिलचा 5-4 असा विजय निश्चित केला. ब्राझिलला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर नेमारने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

ब्राझिलचं ऑलिम्पिकच्या इतिहासातलं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं. पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलला आजवर एकदाही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेलं नव्हतं.  ब्राझीलने 1984, 1988 आणि 2012 सालच्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात धडक मारली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला होता.
=======================================

पोलीस शिपाई मारहाण: भाजप आमदार रामचंद्र अवसरे पोलिसांना शरण

पोलीस शिपाई मारहाण: भाजप आमदार रामचंद्र अवसरे पोलिसांना शरण
भंडारा: भंडाऱ्यात पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले भाजपचे आमदार रामचंद्र अवसरे आज पोलिस स्थानकात हजर झाले. तुमसर पोलिस स्थानकात काही वेळेपूर्वी अवसरे पोलिसांना शरण गेले.

तिरंगा रॅलीदरम्यान अवसरे यांच्या चालकाला पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर भडकलेल्या अवसरेंनी शिपायालाच मारहाण केली. हा सर्व प्रकार पोलिस स्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

सुरुवातीला अवसरेंनी या प्रकरणी कोणतिही दिलगीरी व्यक्त करायला नकार दिला होता. पण अखेर आज 3 दिवसानंतर अवसरे पोलिसांना शरण गेले आहेत.

=======================================

स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंशनमध्ये 5000 रुपयांनी वाढ

स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंशनमध्ये 5000 रुपयांनी वाढ
नवी दिल्ली: आंदमान-निकोबारच्या सेल्यूलर कारागृहात बंदी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मासिक पेंशनमध्ये 5000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना 30,000 रुपये मासिक पेंशन मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर याबाबत घोषणा केली होती.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य सैनिकांसाठी पेंशनमध्ये अंदमानच्या जेलमधील माजी राजकीय कैदी आणि त्यांच्या पत्नींना आतापर्यंत 24,775 रुपये पेंशन मिळत होती, आता ती वाढून 30,000 रुपये करण्यात आली आहे.

ब्रिटिश कालीन भारताबाहेर शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना 23,085 रुपये पेंशन मिळत होती. आता त्यामध्ये वाढ करून 28,000 रुपये करण्यात आली आहे. आझाद हिंद सेनेच्या सदस्यांसोबत इतर स्वातंत्र्य सैनिकांची पेंशन 21,395 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात आली आहे.

देशाच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंशनमध्ये 20% वाढ करण्याची घोषणा केली होती.

=======================================

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीचा मुहूर्त ठरला

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीचा मुहूर्त ठरला
सांगली: मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची पायाभरणी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील “आझादी के 70 साल – जरा याद करो कुर्बानी” या कार्यक्रमांतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Powered By Triangulum” मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक कीर्तीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्यानुसार अरबी समुद्रात सर्वात मोठा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभारला जाणार आहे. त्याच्या कामाची सुरुवात पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे,” असे सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले.

=======================================

निलेश राणेंच्या मारहाणीनंतर संदीप सावंतांचा शिवसेनेत प्रवेश

निलेश राणेंच्या मारहाणीनंतर संदीप सावंतांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई: निलेश राणे यांच्या मारहाणीनंतर आज चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवनात सावंत यांनी आज आपल्या समर्थकांसह भगवा हातात घेतला.

एप्रिल महिन्यात माजी खासदार निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या मराठा आरक्षणाच्या मेळाव्याला संदीप सावंत गैरहजर राहिले होते. त्यामुळं संतापलेल्या नितेश यांनी रात्री घरी जाऊन संदीप सावंत यांना उचलून आणलं. आणि गाडीत घालून मुंबईपर्यंत त्यांना मारहाण केली असा आरोप संदीप सावंत यांनी केला होता.

इतकंच नव्हे तर अंधेरीत अज्ञात ठिकाणी संदीप सावंत यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं. अखेर संदीप सावंत यांच्या पत्नीनं राणे कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर संदीप सावंत यांची सुटका करण्यात आली होती.

=======================================

'त्या' निर्णायामुळे नरसिंग यादव बसल्या जागी बेशुद्ध!

'त्या' निर्णायामुळे नरसिंग यादव बसल्या जागी बेशुद्ध!
रिओ दी जनैरोः उत्तेजक सेवन प्रकरणात क्रीडा लवादाच्या पॅनेलनं चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली, त्याक्षणी भारताचा पैलवान नरसिंग यादव बसल्या जागी बेशुद्ध झाला होता, अशी खळबळजनक बातमी पीटीआयनं दिली आहे.

क्रीडा लवादाच्या पॅनेलनं शिक्षा सुनावतानाच ऑलिम्पिक क्रीडाग्रामही सोडून मायदेशी परतण्याचा दिलेला आदेश, नरसिंगला सहन झाला नाही. तो बसल्या जागीच बेशुद्ध झाला, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी दिली. भारतीय कुस्ती महासंघ अजूनही नरसिंग यादवच्या पाठीशी असल्याचंही ब्रिजभूषण यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणात आपला कुणावरही आरोप नाही, पण सीबीआय चौकशीच्या मागणीवर आपण ठाम असल्याचंही ब्रिजभूषण यांनी स्पष्ट केलं आहे.

=======================================
=======================================

No comments: