[राष्ट्रीय]
१- खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी
२- राजकारणापायी तारुण्य वाया, रावसाहेब दानवेंची टोलेबाजी
३- पठाणकोट - दोन मॅगझीन, २९ जिवंत काडतूस, एक एके-४७ आणि त्याची ५९ जिवंत काडतूस सापडली
४- ‘जलयुक्त शिवार’ ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना : राजेंद्र सिंह
५- मोदींची 'मन की बात' मोबाइलवर
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- लोकसहभाग आणि पारदर्शीपणा नसेल तर स्मार्ट सिटी अपयशी होईल. स्मार्ट सिटी होण्यास १० वर्षे लागतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
७- एमपीएससी' परीक्षेचा निकाल जाहीर; कोल्हापूरचा अजिंक्य आजगेकर राज्यात प्रथम
८- माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे पती ब्रीज बेदी यांचे निधन.
९- मुंबईत गुन्हेगारीची पध्दत सतत बदलते, त्यामुळे पोलिसांचे काम आव्हानात्मक आहे - दत्तात्रय पडसलगीकर
१०- अपंग हिमांशूचा मुंबई-दिल्ली सायकलवारीचा निर्धार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- धर्माबाद; महेश्वरी युवा मिलानोत्सव कार्यक्रम संपन्न
१२- आंध्र प्रदेश - तुनी रेल्वे स्टेशन वर रत्नांचल एक्सप्रेसच्या ५ बोगीला जमावाने आग लावली
१३- पुणे; सळई घेऊन जाणा-या भरधाव ट्रकने लवळे फाटा जवळ ६ वाहनांना उडविले. ३ जण जागीच ठआर तर २ गंभीर जखमी
१४- नागपुरात पोलिसाच्याच घरी चोरी, रोख रकमेसह 6 तोळे सोनं लंपास
१५- कोल्हापूर; ट्रक न थांबवल्याने वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण
१६- अर्धापूर; नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 140 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश
१८- कतरिनाच्या हेअर कलरसाठी ५५ लाख खर्च
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
देण्यासाठी दान, घेण्यसाठी ज्ञान आणि त्यागण्यासाठी 'अभिमान' सर्वश्रेष्ठ आहे
(राजू हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
यावेळी ट्रकचालक आपण दंड भरायला तयार असल्याचंही सांगत होता. मात्र या निर्दयी हवालादाराने ट्रकचालकाच्या मानेवर मारहाण सुरुच ठेवली. त्यामुळे या पोलिसावर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
१- खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी
२- राजकारणापायी तारुण्य वाया, रावसाहेब दानवेंची टोलेबाजी
३- पठाणकोट - दोन मॅगझीन, २९ जिवंत काडतूस, एक एके-४७ आणि त्याची ५९ जिवंत काडतूस सापडली
४- ‘जलयुक्त शिवार’ ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना : राजेंद्र सिंह
५- मोदींची 'मन की बात' मोबाइलवर
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- लोकसहभाग आणि पारदर्शीपणा नसेल तर स्मार्ट सिटी अपयशी होईल. स्मार्ट सिटी होण्यास १० वर्षे लागतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
७- एमपीएससी' परीक्षेचा निकाल जाहीर; कोल्हापूरचा अजिंक्य आजगेकर राज्यात प्रथम
८- माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे पती ब्रीज बेदी यांचे निधन.
९- मुंबईत गुन्हेगारीची पध्दत सतत बदलते, त्यामुळे पोलिसांचे काम आव्हानात्मक आहे - दत्तात्रय पडसलगीकर
१०- अपंग हिमांशूचा मुंबई-दिल्ली सायकलवारीचा निर्धार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- धर्माबाद; महेश्वरी युवा मिलानोत्सव कार्यक्रम संपन्न
१२- आंध्र प्रदेश - तुनी रेल्वे स्टेशन वर रत्नांचल एक्सप्रेसच्या ५ बोगीला जमावाने आग लावली
१३- पुणे; सळई घेऊन जाणा-या भरधाव ट्रकने लवळे फाटा जवळ ६ वाहनांना उडविले. ३ जण जागीच ठआर तर २ गंभीर जखमी
१४- नागपुरात पोलिसाच्याच घरी चोरी, रोख रकमेसह 6 तोळे सोनं लंपास
१५- कोल्हापूर; ट्रक न थांबवल्याने वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण
१६- अर्धापूर; नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 140 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश
१८- कतरिनाच्या हेअर कलरसाठी ५५ लाख खर्च
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
देण्यासाठी दान, घेण्यसाठी ज्ञान आणि त्यागण्यासाठी 'अभिमान' सर्वश्रेष्ठ आहे
(राजू हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 140 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश
सिडनी : धोनीच्या टीम इंडियानं सिडनीच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात सनसनाटी विजय साजरा करून ऑस्ट्रेलियात 3-0 अशा ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली.
भारतानं ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियावर क्लीन स्वीप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिडनीच्या ट्वेन्टी20त ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 198 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अर्धशतकं आणि सुरेश रैना आणि युवराज सिंगनं हाणामारीच्या षटकांत गाजवलेला पराक्रम यांच्या जोरावर भारतानं सात विकेट्स राखून विजय साजरा केला.
=============================================
‘जलयुक्त शिवार’ ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना : राजेंद्र सिंह
चंद्रपूर : जलयुक्त शिवार ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना आहे, असं म्हणत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी जलयुक्त शिवार योजनेची स्तुती केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कारभारावर ताशेरेही ओढले आहे.
मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह चंद्रपुरातील राज्य सरकार आयोजित जलपरिषदेला उपस्थित होते. यावेळी भाषणात राजेंद्र सिंह यांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची स्तुती केली.
“राजेंद्र सिंह यांच्या मते जलशिवार योजनेत समाज जोडला गेला आहे. राज आणि समाज एकत्र आल्यामुळे पारदर्शकता येते आणि त्यामुळे या योजनेतला पैसा भ्रष्टाचारात जाऊच शकत नाही. या आधी 70 हजार कोटी खर्च झाले. मात्र, एक इंच देखील जमीन देखील सिंचित झाली नाही”, असं सांगत राजेंद्र सिंह यांनी आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
=============================================
नागपुरात पोलिसाच्याच घरी चोरी, रोख रकमेसह 6 तोळे सोनं लंपास
नागपूर : नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रसारमाध्यमांकडून टीका होत असली, तरीही नागपुरात रामराज्य असल्याचा दावा नागपूर पोलीस करतात. मात्र, आता तेच पोलीस चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. कारण आता पोलीस मुख्यालय परिसरात राहणारया पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी घरफोडी झाली आहे. एवढेच नाही, तर पोलिस मुख्यालयातून दोन दिवसांपूर्वी पोलिसांची नवीकोरी बुलेट आणि मोठ्या संख्येत बेट्रीज ही चोरीला गेल्या असल्याचे समोर आले आहे.
एखाद्या समस्येची झळ जोवर स्वत: बसत नाही, तोवर त्याची जाणीव ही होत नाही, असे म्हणतात. नागपूर पोलिसांच्या बाबतीत असेच काही घडत आहे.
नागपुरात गुन्हेगारी वाढल्याचे आरोप झाल्यास, वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे आहे गुन्हेगारी, असे विचारतात. नागपुरात जणू रामराज्य असल्याचा चित्र रंगवतात. मात्र, त्याच नागपुरात आता खुद्द पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुन्हेगारीची झळ बसत आहे.
नागपूर पोलिस मुख्यालय परिसरातल्या पोलिस लाईन मध्ये राहणारे शीघ्र कृती दलाचे पोलिस कर्मचारी संदीप मालवकरच्या घरी घरफोडी झाली आहे. मालवकर कुटुंब सध्या अकोल्याला गेलेले असल्यामुळे किती मुद्देमाल चोरीला गेला आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, 6 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या असल्याची माहिती मिळते आहे.
चोरट्यांनी थेट पोलिस मुख्यालय परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचारीच्या घराला लक्ष्य केल्यामुळे पोलिस अधिकारी ही हादरले आहेत. संपूर्ण पोलीस लाईन परिसरात किती पोलीस काल रात्री गश्तीवर होते, किती ठिकाणी नाकाबंदी केली होती, याची झाडाझडती आता सुरु करण्यात आली आहे.
=============================================
राजकारणापायी तारुण्य वाया, रावसाहेब दानवेंची टोलेबाजी
जालना : भाजप प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा जालन्यात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारणापायी तारुण्य वाया गेल्याची खंत दानवेंनी बोलून दाखवली.
दानवेंनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. राजकारण आणि कार्यकर्ते सांभाळता सांभळता तारुण्य वाया गेलं, अशी टोलेबाजी दानवेंनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
‘देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आपण प्रदेशाध्यक्ष झालो. मात्र आता मुख्यमंत्री फडवणवीसांची जागा रिक्त होणं शक्य नाही त्यामुळे मुख्यमंत्रिपद आपल्या वाटेला येणार नाही’ असा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला.
=============================================
ट्रक न थांबवल्याने वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण
कोल्हापूर : कोल्हापुरात वाहतुक पोलिसांच्या दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाला वाहतुक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना कॅमेरात कैद झाली आहे.
यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण या हवालदाराने नागरिकांना धमकी देत त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केला. संदीप अबीटकर असं या पोलिस हवालदाराचं नावं असल्याची माहिती आहे.यावेळी ट्रकचालक आपण दंड भरायला तयार असल्याचंही सांगत होता. मात्र या निर्दयी हवालादाराने ट्रकचालकाच्या मानेवर मारहाण सुरुच ठेवली. त्यामुळे या पोलिसावर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
=============================================
अपंग हिमांशूचा मुंबई-दिल्ली सायकलवारीचा निर्धार
मुंबई : अपघातात अपंगत्व आलेला एक तरुण इतर अपंगांना प्रेरणा देण्यासाठी एका सायकल प्रवासावर निघाला आहे. आपला संपूर्ण डावा पाय गमावलेला हिमांशू कुमार मुंबई ते दिल्ली हा प्रवास सायकलने करणार आहे.
मुंबई ते दिल्ली हा जवळपास 1500 किमीचा प्रवास सायकलद्वारे 15 दिवसात पार करण्याचा त्याचा निर्धार आहे. भारताचा तिरंगा फडकवून हिमांशूने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
त्याच्या या मनोदयास पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते हाजी अरफात शेख, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांनी हिमांशूसोबत कुर्ला ते वांद्रे दरम्यान सायकल चालवून सहभाग घेतला.
=============================================
खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी
' भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता खादीमध्ये आहे' असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले होते. सध्याच्या तरूणांमध्ये खादीचे आकर्षण खूप वाढले असून कोट्यावधी नागरिकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या खादीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. नवीन वर्षात मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांसी 'मन की बात'द्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत त्यांनी विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती दिली.
' सध्या खादीच्या माध्यमातून १८ लाख रोजगार निर्मिती झाली आहे. यामध्ये कोट्यवधींना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्याकडे एक खादीचा जोड ठेवला पाहिजे' असे ते म्हणाले.
दरम्यान आता देशवासियांना ' मन की बात ' कधीही ऐकता येणार. मोबाईवरून 8190881908 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर मन की बात कुठेही व केव्हाही ऐकता येऊ शकेल, असे मोदींनी नमूद केले. ५० टक्के शेतकऱ्यांना पिकविमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदींच्या 'मन की बात' मधील महत्वाचे मुद्दे :
- देशासाठी प्राणांची आहुती देणा-यांना श्रद्धांजली वाहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. दरवर्षी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सव्वाशे कोटी भारतीयांनी २ मिनिटांसाठी मौन पाळावे.
- भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले आहे. तरूण पिढीसाठीही खादी आकर्षण बनत आहे.
- २६ जानेवारी रोजी हरियाण, गुजरातमध्ये एक अनोखा प्रयोग दिसला. गावातील सर्वात शिक्षित मुलीला ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. या कृतीततून 'बेटी बचाव- बेटी पढाओ'चा एक उत्तम संदेश या कृतीतून देण्यात आला.
- आता 8190881908 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन 'मन की बात' कधीही ऐकता येणे शक्य.
- ५० टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार आहे.
- आंध्र प्रदेशमधील विशाखा पट्टणम येथील समुद्र किनाऱ्यावर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. जगातील प्रमुख देशांची लढाऊ जहाजं व युद्धनौका या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहे. भारताने ही मोहीम आयोजित केल्याचा अभिमान वाटतो.
=============================================
अर्धापूर; नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया
अर्धापूर शहरात लंगडे गली हनुमान चोक येथील बोअरवेल वर प्रशासनाचे लक्ष नसल्या कारणाने येथील रहिवाशांनी आपल्या ला हवे असेल तेव्हा बोअरवेल चालू करत आहेत। हया बोअरवेल ला 3 (तीन) ठीकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी नळ बसवण्यात आले आहे।पण त्यातील ऐकयाही नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे।
आजच्या हया बिकट दूशकाळात जर ऐवठया मोठया प्रमाणात जर पाणी वाया जात असेल तर हयाची सर्व जबाबदारी कोणाची? असे जनतेचे म्हणणे आहे।....
=============================================




