Sunday, 29 November 2015

सर्वबहुजनांनी एकत्र येऊन लढल्यास फुले शाहु आंबेडकरांचे स्वप्न साकर होणार - सुरेशदादा गायकवाड



नांदेड (गंगाधर गच्चे)
या देशामध्ये बहुजन समाज विखुरलेला असुन एकांमेकांना जवळ येऊ दिले नसल्यामुळे आपली उन्नती झाली नसुन, फुले शाहु आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले
नाही त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास ते पुर्ण होईल असे मत बहुजन समाज पार्टीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांनी दि.28 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा
ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निर्मीत आयोजीत केल्याला अभिवादंन सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ओबीसी महिला आघाडीच्या सौ.माधवी मठपती, राष्ट्रीय समाज पक्षाचे रामचंद्र येईलवाड, प्रा.महेश माली, सुरेंद्र  जयस्वाल, रापते आदी मान्यवरांची उपस्थीती  होती.
पुठे बोलतांना म्हणाले की आज आपल्या देशामध्ये बहुजनांच्या विकासाला खिळ घालण्याचे पडयंत्र येथील काही लोक करीत असुन आपण इतरत विखरल्यामुळे आपल्यामध्ये भांडणे
 लावुन स्वताःची पोळी भाजुन घेत आहेत आज बहुजन समाजातील ओबीसी,एस.टी,एस.टी,यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.  त्यामुळे आपण जर एकत्र आल्यास नकीच महापुरुषांचे
 स्वप्न पुर्ण होणार आहे असे ही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले सर्व प्रथम महात्माफुले यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांनतर मान्यवंरानी आपले मनोगत व्यक्त केले

No comments: