Tuesday, 24 November 2015

नमस्कार लाईव्ह २४-११-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २४-११-२०१५चे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- भारतीय तरुण भित्रे, आयसिसचा दावा, सुसाईड बॉम्बर म्हणूनच त्यांचा वापर
२- पाकिस्तानमध्ये होणा-या 'हार्ट ऑफ एशिया' कॉन्फरन्समध्ये भारत सहभागी होणार
३- म्यानमारमधील भूस्खलन बळींची संख्या वाढून शंभरहून अधिक, बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध, दुर्घटना पाचूच्या खाणीजवळ घडली
४- सीरियाच्या सीमेलगत तुर्कीने लष्करी विमान पाडल्याचे वृत्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- हिंदूबहुल देशात तीन मुस्लिम सुपरस्टार, मग भारत असहिष्णु कसा? : राम गोपाल वर्मा
६- वीरपत्नीचा देशसेवेचा निर्धार, तर आमीरच्या पत्नीचा देश सोडण्याचा विचार
७- भारत सोडण्याबद्दलचे वक्तव्य करून आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करू. जोपर्यंत ही पृथ्वी आहे, तोपर्यंत आम्ही भारत सोडून जाणार नाही वा कोणी आम्हाला भारत सोडण्याची जबरदस्तीही करू शकत नाही - एमआयएम नेते असदुद्दीन ओवौसी
८- ...तो सूट लंडनवासियांना मात्र प्रंचड आवडला: रामदास आठवले
९- भारत-पाक क्रिकेट मालिका श्रीलंकेत, शुक्रवारी घोषणेची शक्यता
१०- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उद्या बंगळुरूच्या दौ-यावर
११- जातीय हिंसेत वाढ पण मृतांच्या संखेत घट - केंद्रीय गृहमंत्रालय
१२- बर झालं केजरींची साथ सोडली - अण्णा
१३- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी लागली आग, अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल
१४- नागालँडमध्ये एका खासगी हेलकॉप्टर कोसळले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार पोगरवाडीत, शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांची भेटी घेणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- अहमदनगर: मजुराचा अपहरण करुन खून प्रकरणी हॉटेल चालक युवराज जगताप अटक
१७- औरंगाबाद: बीड बायपास रोडवर ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन एका महिलेचा झाला मृत्यू
११- नांदेड : नगीनाघाट येथे गोदावरी गंगा पूजनाचे दि. २६ रोजी आयोजन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आमीर खानविरोधात संतापाची लाट, नेटीझन्स, फिल्मी कलाकारांकडून खरपूस समाचार
१९- आमीरच्या पत्नीला कोणत्या देशात स्थायिक व्हायचंय? : अनुपम खेर
२०- रणबीर कपूर माझ्या परवानगीशिवाय लग्न करु शकत नाही - दीपिका पादुकोन
२१- हॅपिटायटिस बीमुळे ७५ टक्के लिव्हर निकामी झाले - अमिताभ बच्चन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात. कारण....
जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु असी झाडे कोणीच तोडत नाहीत पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात
[बालाजी ठोसने, नमस्कार लाईव्ह वाचक]

No comments: