मन कि बात नोव्हेंबर २०१५ मधील महत्वाचे मुद्दे
सणांच्या वेळेस जेव्हा एखादी आपत्ती येते, ते खूप दु:खदायक असतं
तामिळनाडूतील पुराचा फटका बसलेल्या सर्व कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी आहे. केंद्र, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना धीर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत
नेपाळमधील भूकंपानंतर मी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा केली व आत्पकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी 'सार्क' देशांनी मिळून तयारी केले पाहिजे, असे सुचवले - पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगाला नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे
शारिरीक व मानसिक रित्या सक्षम नसलले लोकही आपल्यासाठी एका प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांच्याकडेही अचाट साहस व सामर्थ्य असतं
बिल व मिलिंडा गेट्स हे दोघे भारतात अनेक ठिकाणी समाजसेवा करतात, ते त्यांची कमाई गरिबांसाठी खर्च करतात
MY GOV वर जाऊन स्वच्छ भारत, आदर्श गाव आणि हेल्थ क्षेत्राशी निगडीच ३ ई-बूक्स पाहा. आणि त्याबद्दल काही सूचना असल्यास त्या MY GOV वर पाठवा - पंतप्रधान मोदींचे तरूणांना आवाहन
वातावरणातील बदलामुळे सर्व जग चिंतीत झाले आहे, यापुढे पृथ्वीचे तापमान वाढणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे - पंतप्रधान मोदी
छोटी-छोटी कामे करणा-या व्यक्तीच देशाची आर्थिक शक्ती असतात, आपण त्यांचे बळ वाढवले पाहिजे
हिवाळा जवळ येत असून, कसर्वांनी व्यायाम करून तंदुरूस्त रहावे, असा सल्ला मी देतो. 'अच्छा मौसम है तो अच्छी आदत भी होनी चाहिये'
सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी (३१ ऑक्टोबर) मी एक भारत- श्रेष्ठ भारताबद्दल चर्चा केली होती, त्याला योजनेचे रुप देण्याची माझी इच्छा असून, त्यासाठी सर्वांनी सूचना पाठवाव्यात - पंतप्रधान मोदी
No comments:
Post a Comment