देगलूर [संदीप देसाई, तालुका प्रतिनिधी]
देगलूर शहरातील देशपांडे गल्ली, भट्टगल्ली, बंडा गल्ली परिसरात चार-पाच दिवसापासून एक वेळा पाणीपुरवठा होतो, परंतु कमी दाबाचा पाणी पुरवठा होत असल्याने नळाला झटके मारत पाणी ये-जा होत आहे.
देशपांडे गल्लीच्या मागच्या बाजूस पाणी पुरवठा दोन वेळा एक-एक तास होत आहे. पाणी रस्त्यावरून वाया जात आहे.
परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. नियोजनाअभावी आणि पुरवठा कमी दाबाने होत आहे, असे ऐकावयास मिळत आहे.
परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment